शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Uddhav Thackeray : बंड करणाऱ्या आमदारांना त्यावेळी थांबवलं का नाही? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:33 IST

Uddhav Thackeray : 'ज्यांना थांबायचे त्यांनी थांबावे, नाहीतर गेट आऊट...'

Uddhav Thackeray : काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना घेऊन बंड केलं आणि त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाले. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसतात. यातच आता आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या बंडावर भाष्य केले.

आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह उद्धव ठाकरे यांनीही भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडावर मोठा खुलासा केला. सूरत-गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना थांबवलं का नाही? याचे कारण त्यांनी सांगितले. 'मला अनेकदा विचारतात की, तुम्हाला याबाबत आधी माहीत नव्हतं का? तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? त्यांना कशाला थांबवू, लोक येतात-जातात.' 

'ही माणसं विकली गेली आहेत, त्यांना सोबत घेऊन लढाई कशी लढायची. ज्यांना थांबायचे त्यांनी थांबावे, नाहीतर गेट आऊट. दरवाजा उघडा आहे. मी त्यांना कशाला थांबवू. ते शिवसैनिक होण्याच्या लायकीचे नाहीत, मला विकाऊ माणसे नकोत. कुणी सांगेल तशीच भूमिका घ्यायची, इतका लाचार मी कधीच झालो नाही,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

जुन्या पेन्शनवरुन टीकायाआधी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना जुन्या पेन्शनवरही भाष्य केले. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत, कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संप सुरू आहे, पण हे सरकार दिल्लीश्वरांची मर्जी राखण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. बळीराजा आक्रोश करत असताना सरकारला त्यांच्यासाठी वेळ नाही. मुंबईतील व्यवसाय आणि कार्यालय हे दुसऱ्या राज्यात जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला

जुनी पेन्शन योजना लागू करायला हवी, आमचा त्यासाठी पाठिंबा आहे, केंद्राची शक्ती पाठीमागे असताना योजनेला काय समस्या आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर अडवाणींच्या काळात ही योजना रद्द करण्यात आली असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंचामृत योजनेचा अर्थ हा हे सरकार कुणाला पोटभर मिळणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना