शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळेच महाराष्ट्रातील राजकारण बिघडले, विनोद तावडे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:09 IST

महायुती सत्तेवर येण्याचा विश्वास

कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकारण फारच बिघडले आहे. २०१९ साली जनतेने भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांना कौल न स्वीकारता उद्धव ठाकरे यांनी जनतेशी गद्दारी केली. त्यामुळेच हे वातावरण बिघडल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकाेडे उपस्थित होते.तावडे म्हणाले, व्यंगापासून ते प्राण्यांचा उल्लेख करत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे, हे सर्वपक्षीयांनी थांबवायला हवे. मी विरोधी पक्षनेता होताे. परंतु सभागृहात खडाजंगी झाली तरी आम्ही सत्तारूढांसोबत जेवतही होताे. वैयक्तिक दुश्मनी नव्हती. परंतु उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि मग वातावरण बिघडत गेले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राममंदिराला विरोध करणाऱ्या कॉंग्रेससोबत गेल्याचे न पटल्याने एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांना आम्ही फक्त साथ दिली.

ते म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढत झाली. त्यामध्ये काहीअंशी महायुतीला फटका बसला. परंतु विधानसभेला एमआयएम, वंचित, समाजवादी पक्ष, अपक्ष बंडखोर यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतविभाजन अटळ आहे. हरयाणातील भाजपच्या विजयाने देशभरात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये आम्ही सहज सत्तेवर येऊ.

२०१४ ला राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाच होताकेवळ बहुमतापेक्षा चारच आमदार जास्त असताना कोणतेही धाडसी निर्णय घेता येत नव्हते. त्यासाठी मजबूत सरकारची गरज असते. म्हणून अजित पवार यांची साथ स्वीकारली. परंतु चौकशीत समझोता केला नाही. परंतु २०१४ साली जेव्हा युती निवडून आल्यानंतरही उद्धव ठाकरे सरकार बनवायला तयार नव्हते तेव्हा शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि आम्ही तो घेतला होता. त्यामुळे अजित पवार सोबत येणे यात वेगळे काही घडले नाही, असेही तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरVinod Tawdeविनोद तावडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024