शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

पुढील महिन्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; माजी मंत्र्यांचा दावा खरा ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:13 IST

याआधी उद्धव ठाकरे कुटुंबासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती.

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं पुढे आलं आहे. संसदेच्या अधिवेशन काळात ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलं आहे. त्यात ठाकरे खासदारांची बैठक आणि इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं पुढे आलंय. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील नेते राहुल गांधी, सोनिया गांधींसह इतरांनी भेट घेतली होती. मात्र आता ठाकरेंचा दिल्ली दौरा अनेक कारणांसाठी चर्चेत आहे.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांत सुरू होतंय त्यात उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जातायेत. यावेळी ते पक्षाचे खासदार यांची बैठक घेणार आहेत त्याशिवाय इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. नुकतेच माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत दावा केला होता. उद्धव ठाकरे, शरद पवार हे लवकरच केंदात भाजपासोबत जाताना दिसतील असं त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक-दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असं कडू यांनी म्हटलं होते. 

दरम्यान, याआधी उद्धव ठाकरे कुटुंबासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. ही भेट विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा यावरून झाल्याचं सांगण्यात आले. मात्र या भेटीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यात काँग्रेस-ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून पराभव पत्करावा लागला. ठाकरे गटाचे अवघे २० आमदार विधानसभेत निवडून गेले. मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीस याच्याशी जवळीक साधत त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. तेव्हापासून ठाकरे भाजपासोबत येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBacchu Kaduबच्चू कडूBJPभाजपा