शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पुढील महिन्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; माजी मंत्र्यांचा दावा खरा ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:13 IST

याआधी उद्धव ठाकरे कुटुंबासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती.

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं पुढे आलं आहे. संसदेच्या अधिवेशन काळात ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलं आहे. त्यात ठाकरे खासदारांची बैठक आणि इंडिया आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं पुढे आलंय. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील नेते राहुल गांधी, सोनिया गांधींसह इतरांनी भेट घेतली होती. मात्र आता ठाकरेंचा दिल्ली दौरा अनेक कारणांसाठी चर्चेत आहे.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांत सुरू होतंय त्यात उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जातायेत. यावेळी ते पक्षाचे खासदार यांची बैठक घेणार आहेत त्याशिवाय इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. नुकतेच माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत दावा केला होता. उद्धव ठाकरे, शरद पवार हे लवकरच केंदात भाजपासोबत जाताना दिसतील असं त्यांनी म्हटलं होते. त्यामुळे ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक-दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये, हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असं कडू यांनी म्हटलं होते. 

दरम्यान, याआधी उद्धव ठाकरे कुटुंबासह ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. ही भेट विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा यावरून झाल्याचं सांगण्यात आले. मात्र या भेटीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यात काँग्रेस-ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून पराभव पत्करावा लागला. ठाकरे गटाचे अवघे २० आमदार विधानसभेत निवडून गेले. मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीस याच्याशी जवळीक साधत त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. तेव्हापासून ठाकरे भाजपासोबत येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBacchu Kaduबच्चू कडूBJPभाजपा