शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

"शिवसेना या आईवर वार केलाच ना.."; उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 08:25 IST

शिवसेना कुणाची हा लोकांचा प्रश्न नाहीच. कारण लोकांनी ठरवलेले आहे जिथे शिवसेनाप्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असं त्यांनी म्हटलं.

मुंबई – बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या मेहनतीने जे देऊ शकत होतो ते दिले. बरेच लोक बाहेरून आले तसे गेले असं नाही. ते तसे आले-गेले हा एक भाग झाला, पण ज्यांचा राजकारणातला जन्मच शिवसेनेत झाला. त्यांनीसुद्धा शिवसेना आईवर वार केलाच ना अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आजही काही असंख्य लोक आहेत ज्यांना दिल्यानंतरही ते गेलेले नाहीत. ते माझ्यासोबत आहेत. या पॉडकास्टमध्ये नितीन देशमुख, कैलास पाटील येऊन गेले. बाकी असे अनेक आहेत. मुंबईचे रवींद्र वायकर, अजय चौधरी, सुनील प्रभू किती जणांची नावे घ्यायची, मुंबईबाहेरच सुद्धा अनेक आहेत. शिवसेना कुणाची हा लोकांचा प्रश्न नाहीच. कारण लोकांनी ठरवलेले आहे जिथे शिवसेनाप्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असं त्यांनी म्हटलं.

तसेच मी माझ्या हिंदुत्वाची चौकट जी माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलेली आहे. ती चौकट मी सांगितलेली आहे. या देशावर प्रेम करतो, जो देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आणि आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे किंवा देवळात घंटा बडवणाऱ्यांचे नाही. हे काही कर्मकांड वैगेरे यावर ठेवणारे आमचे हिंदुत्व नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

...तर न्यायालयाचे दरवाजे उघडे

शिवसेनेची जी काही मागणी आहे ती संविधानाच्या तरतुदींना धरूनच आहे. या तरतुदी पुसता येणार नाहीत. मग तुम्हाला संविधान बदलावे लागेल. घटना बदलावी लागेल. पात्र-अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. ज्याप्रमाणे शिवसेना कुणाची यासाठी आम्ही न्यायालयात गेलो तिथे न्यायालयाने निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे त्यामुळे हे ठरवण्याचा अधिकार आयोगाचा आहे. आधी त्यांच्याकडे जा, तिथे तुम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्याकडे परत या. निवडणूक आयोगाच्याविरुद्ध आपण न्यायालयात गेलो आहोत. तसेच विधानसभा अध्यक्षांनी घटनेला धरून न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत असं सांगत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदार अपात्र ठरवले नाहीत तर न्यायालयात जाण्याचे सूचक विधान केले आहे.

लोकशाही साधा माणूस वाचवणार

हा देश प्रत्येकाचा आहे. त्यानेच आता धैर्याने उभं राहायला हवं. हे सरकार कुणाचे आहे तर हे सरकार माझे आहे. त्या सामान्य माणसाचे आहे. त्या सामान्य माणसाच्या मतांवर हे सरकार निवडून आले आहे. त्या सामान्य माणसाने आता विचार करून मत दिले पाहिजे. कारण तो नुसते मत देत नाही तर तो त्याचं आयुष्य यांच्या हातात देतोय. नुसतं आयुष्य नाही तर पुढच्या पिढीचं भविष्य यांच्या हातात देतोय. कारण यांना सत्तेत दहा वर्ष झाली म्हणजे एक पिढी पुढे सरकली. या पुढच्या पिढीसाठी जनतेने आताच शहाणे व्हायला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे