शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, अमित शहा यांचा घणाघात; विश्वासघात करणाऱ्यांना जागा दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 08:31 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई: उद्धव ठाकरेंनी भाजपचा, जनतेचा विश्वासघात केला; धोका दिला. आयुष्यात सगळे काही सहन करा पण राजकारणात धोका सहन करू नका. आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंना जागा दाखवून द्या, असा आदेश देतानाच केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबई महापालिकेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य मुंबई भाजपला दिले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

धोका देणाऱ्यांना शिक्षा दिलीच पाहिजे२०१९ च्या निवडणूक निकालानंतर अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द मोडला, असे कारण देत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा करीत अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजकारणात अन्यायाला जागा असते, पण धोक्याला अजिबात नाही. ज्यांना धोका सहन करण्याची सवय असते ते आपले स्थान कधीही मजबूत करू शकत नाहीत. जो धोका देतो त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. उद्धव यांनी आपल्याला धोका दिला. जनमताचा अनादर करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनविले. आता त्यांना जमीन दाखवा. राजकारणात सगळे सहन करा पण धोका सहन करू नका. मोदी-फडणवीसांच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेने भाजपचा आणि जनतेचाही विश्वासघात केला, असा घणाघातही शहा यांनी केला.

मुंबईवर भाजपचाच झेंडायावेळी फडणवीस, बावनकुळे व शेलार यांची भाषणे झाली. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या साथीने मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राज्यातील सत्तांतराचे सर्व श्रेय अमित शहा यांचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेने जागा पाडल्याअडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द मी उद्धव ठाकरे यांना कधीही दिलेला नव्हता, असे सांगतानाच २०१९ मध्ये युती असूनही शिवसेनेने भाजपच्या काही जागा पाडल्या असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला. -वृत्त/महाराष्ट्र

घर के सामने मारा तो...‘कही भी मारा तो चोट लगती ही है, पर घर के सामने मारा तो दिल को चोट लगती है...’ या शब्दांत शहा यांनी मुंबईच्या मैदानातच शिवसेनेला चारीमुंड्या चित करण्याचे आवाहन भाजप नेत्यांना केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे