शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, अमित शहा यांचा घणाघात; विश्वासघात करणाऱ्यांना जागा दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 08:31 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई: उद्धव ठाकरेंनी भाजपचा, जनतेचा विश्वासघात केला; धोका दिला. आयुष्यात सगळे काही सहन करा पण राजकारणात धोका सहन करू नका. आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंना जागा दाखवून द्या, असा आदेश देतानाच केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबई महापालिकेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य मुंबई भाजपला दिले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

धोका देणाऱ्यांना शिक्षा दिलीच पाहिजे२०१९ च्या निवडणूक निकालानंतर अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द मोडला, असे कारण देत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा करीत अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजकारणात अन्यायाला जागा असते, पण धोक्याला अजिबात नाही. ज्यांना धोका सहन करण्याची सवय असते ते आपले स्थान कधीही मजबूत करू शकत नाहीत. जो धोका देतो त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. उद्धव यांनी आपल्याला धोका दिला. जनमताचा अनादर करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनविले. आता त्यांना जमीन दाखवा. राजकारणात सगळे सहन करा पण धोका सहन करू नका. मोदी-फडणवीसांच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेने भाजपचा आणि जनतेचाही विश्वासघात केला, असा घणाघातही शहा यांनी केला.

मुंबईवर भाजपचाच झेंडायावेळी फडणवीस, बावनकुळे व शेलार यांची भाषणे झाली. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या साथीने मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राज्यातील सत्तांतराचे सर्व श्रेय अमित शहा यांचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेने जागा पाडल्याअडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द मी उद्धव ठाकरे यांना कधीही दिलेला नव्हता, असे सांगतानाच २०१९ मध्ये युती असूनही शिवसेनेने भाजपच्या काही जागा पाडल्या असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला. -वृत्त/महाराष्ट्र

घर के सामने मारा तो...‘कही भी मारा तो चोट लगती ही है, पर घर के सामने मारा तो दिल को चोट लगती है...’ या शब्दांत शहा यांनी मुंबईच्या मैदानातच शिवसेनेला चारीमुंड्या चित करण्याचे आवाहन भाजप नेत्यांना केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे