शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"कारण तेव्हा उद्धव ठाकरे जंगलात..."; संजय राऊतांच्या आरोपावर भाजपाकडून खोचक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:54 IST

राऊतांच्या 'स्मरणगोळी' वाल्या ट्विटवरून केला जळजळीत शाब्दिक वार

Sanjay Raut Uddhav Thackeray vs BJP: भारतात सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती अयोध्येतील राम मंदिरात प्रभूरामाच्या प्राणप्रतिष्ठेची. पंतप्रधान मोदी आणि इतर महत्त्वाच्या मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमंत्रणावरूनही अनेक नाराजीनाट्य रंगली. पण या सर्व गोंधळात बाबरी नेमकी कोणी पाडली, त्यावेळी तेथे नेमके कोण लोक होते? अशा चर्चाही अजून सुरू आहेत. भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून बाबरी पाडण्यात त्यांच्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. त्यातच संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपावर टीका केली. त्याला भाजपाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले.

संजय राऊतांचा दावा काय?

संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी एका मुलाखतीत बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावर बोलत आहेत. या व्हिडीओत अटलजींच्या म्हणण्यानुसार, अयोध्येत त्यावेळी उपस्थित असलेल्या भाजपाच्या नेतेमंडळींना कोलाहल नको होता, त्यामुळे त्या नेत्यांनी बाबरी मशीद पाडू नये यासाठी प्रयत्न केला होता. सध्याच्या भाजपा नेत्यांकडून सातत्याने दावा केला जातो की, बाबरी पाडण्यात भाजपाचेही लोक होते. पण अटलजींच्या याच वाक्यावरून संजय राऊतांनी आताच्या भाजपा नेत्यांना स्मरणगोळीची आवश्यकता आहे असा टोला लगावला. "महाराष्ट्रातील.. श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे... तथाकथित राम भक्तांसाठी.. ही 'स्मरण गोळी' Memory tablets.. उगाळून घ्या.. आणखी देखील जालीम डोस आहेत.. योग्य वेळी देऊच.." असे ते ट्विट होते.

भाजपाने घेतला संजय राऊतांचा समाचार

भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या मुद्द्यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोघांना लक्ष्य केलं. "अहो सर्वज्ञानी …. संजय राऊत, आमच्यासाठी स्मरणगोळीची उठाठेव करण्यापेक्षा तुम्ही स्वत:च्या ‘लाँग टर्म मेमरी लॅास’वर उपचार घ्या. राम मंदिर आंदोलनातलं स्वर्गीय बाळासाहेबांचं योगदान भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी कधीच नाकारलेलं नाही. आम्ही सवाल उद्धवजी आणि तुमच्या योगदानाबद्दल उपस्थित करतो कारण तेव्हा उद्धवजी जंगलात प्राण्यांच्या संगतीत रमले होते आणि तुम्ही राम जन्मभूमी आंदोलनावर विखारी आसूड ओढत होतात.. प्रदीर्घ काळ चाललेला राम मंदिराचा लढा रामभक्तांच्या सहकार्यातून नेटाने पूर्णत्वाला नेला तो भाजपनेच… त्यामुळे आता उगाच कोल्हेकुई करून तुमच्या हाती काही लागणार नाही," असे खोचक उत्तर चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतChitra Waghचित्रा वाघBJPभाजपा