शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:45 IST

Uddhav Thackeray News: लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray News: मी कुणाला शत्रू मानत नाही. मोदींनाही मानत नाही. ते मानत असतील तर माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांना विरोधक म्हणून बोलत नाही. फडणवीस हतबल झालेत. कशामुळे हतबल आहेत माहिती नाही. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. एवढ्या वर्षानंतर बहुमत आहे. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे. एवढे पाठबळ असलेला मुख्यमंत्री एवढा हतबल का हे माहिती नाही. याचे कारण म्हणजे खुले आम भ्रष्टाचार सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता. हा प्रश्न तीनही पक्षांनी सोडवायला हवा. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढले पाहिजे. तिन्ही पक्षांना वाटले एकत्र लढायचे, तर लढू शकतो. पण कुणाला वाटले स्वतंत्र लढायचे तर तसे होऊ शकते. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या स्थानिक नेते पदाधिकार्‍यांच्या भावनाही समजून घेऊ, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

मी पूर्ण ताकदीने शिवसेना इथे कामाला लावेन

शिवसेनेची ताकद पुण्यात आहे. आम्ही आतापर्यंत युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्यावेळी युती म्हणून पुण्याकडे दुर्लक्ष केले. त्याबद्दल पुणेकरांची माफी मागतो. पण पुणेकरांना हवे असेल तर मी पूर्ण ताकदीने शिवसेना इथे कामाला लावेन. पण हे पुणेकरांनी ठरवायचे आहे. तुम्ही जर प्रेमाने बोलावले तर मी येईन पुण्यात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, २००५ पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्यानंतर एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. आणि रोज उठून आम्ही एकत्र आलो. एकत्र आलो असे बोलण्याची गरज नाही. ५ जुलैला मेळावा घेतला. एकत्र यायचे नसते तर मेळाव्यात सोबत आलो नसतो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : We suffered due to alliances; will consider locals' feelings: Thackeray

Web Summary : Uddhav Thackeray stated he doesn't consider Modi an enemy. He criticized Fadnavis' helplessness despite a strong majority, attributing it to open corruption. He expressed readiness to strengthen Shiv Sena in Pune if desired by locals, apologizing for past neglect due to alliances. He also addressed speculations about reuniting with Raj Thackeray.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी