शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
4
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
5
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
6
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
7
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
8
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
9
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
10
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
11
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
12
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
13
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
14
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
15
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
16
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
17
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
18
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
19
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
20
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!

"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:29 IST

छत्रपती संभाजीनगर येथील मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.

Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजी नगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये दिवाळीआधीच जमा करा असं आव्हान दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी कशात पाहायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे म्हटलं. तसेच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.

ठाकरे गटाच्या हंबरडा मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वतःला आरशात बघितलं, तर अशा प्रकारचे मोर्चे काढणार नाहीत. मी यापूर्वीही सांगितलं ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यांना दिली नाही. ठाकरेंच्या आधी आम्ही सत्तेत असताना देखील २० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे त्यांनी काही फार मोठे काम केलं असे नाही. उलट त्यांनी घोषणा केली होती, चालू खात्यावर आम्ही ५० हजार रुपये देऊ, मात्र, त्यांनी काहीही दिले नाही. उलट १६ लाख शेतकऱ्यांना महायुतीचे सरकार आल्यावर अनुदान दिले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी मोर्चानंतर प्रत्युत्तर दिले. "मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा. तुम्हीच सांगताय की आतापर्यंत कधी आलेले नाही असं हे भीषण संकट आहे. मुख्यमंत्री असताना नागपूरला जे अधिवेशन झाले होते तेव्हा असे संकट नव्हते. तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्जमुक्ती केली होती. जो शेतकरी नियमित कर्जफेड करतो त्यांसाठी ५० हजारांची राशी जाहीर केली होती. त्यांनी २०१७ साली केलेली कर्जमुक्ती अजूनही चालू आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

"शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांना ५० हजार हेक्टरी मिळावेत. गेल्या हंगामाचे कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. हे पीक हाती लागलं असतं तर शेतकऱ्यांना थोडे पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती. आता जमीन पूर्ववत करुन देण्याची गरज आहे आणि कर्जमाफीची गरज आहे. कारण ते आता कर्ज फेडूच शकत नाहीत. त्यामुळे सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. पंतप्रधान मुंबईत येऊन गेले पण त्यांनी शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. जिथे तुम्ही जाताय तिथे शेतकरी सुद्धा आहे याची कल्पना त्यांना दिली होती की नाही हे माहिती नाही. पंतप्रधान मोदींचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी हे  पॅकेज जाहीर केले," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray Counters CM Fadnavis' Criticism, Focuses on Farmers' Plight

Web Summary : Uddhav Thackeray criticized the government for neglecting rain-affected farmers during his rally. He demanded immediate financial aid and loan waivers, countering CM Fadnavis' remarks. Thackeray highlighted his past efforts for farmers and questioned PM Modi's silence on the issue during his visit.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस