शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

"औरंगजेब, अफजल खान हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे, ते जर यांना...", ठाकरेंनी CM फडणवीसांना घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:23 IST

Uddhav Thackeray on Nagpur Violence News: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक सवाल केले. 

Nagpur Violence Uddhav Thackeray Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनागपूरचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय नागपूरमध्ये, मग नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा? ही दंगल पूर्वनियोजित होती, तर मग गृह खातं झोपा काढत होतं का? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले. औरंगजेब, अफजल खान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे पुरावे आहेत. तुम्हाला त्यांना हटवायचं असेल, तर आंदोलन करण्यापेक्षा मोदींकडे जाऊन त्यांना हटवायला सांगा", असे खडेबोल ठाकरेंनी सुनावले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचे संरक्षण आहे, तर औरंगजेब भाजपचा कोण? असा सवालही त्यांनी केला. 

औरंगजेबाचं कुणीही समर्थन करणार नाही -ठाकरे

विधानभवन परिसरात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं, त्या स्वराज्यावर महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता, पण इथल्या मातीचा कणही जिंकू शकला नाही. अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही करणार नाही." 

डबल इंजिन सरकार फक्त वाफा सोडतंय का?

"जर कोणी त्याचं थडगं उखाडण्याची भाषा करत असेल, तर फक्त भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे, ते फक्त वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखाडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे. आणि त्याला केंद्राचे संरक्षण आहे. केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल, तर मग भाजपला आम्ही विचारतोय की तो औरंगजेब तुमचा कोण लागतो?", असा सवाल ठाकरेंनी केला. 

"औरंगजेब असो, अफजल खान असो हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना वाटत असेल, नष्ट करायचे, तर आंदोलन काय करत आहात. तुम्ही सरकारकडे जा. मोदींकडे जा. मोदींना म्हणा की, गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब, ज्याला महाराष्ट्राने मुठमाती दिली, ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा. तो सोहळा जेव्हा कराल, तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा. सोप्पा विषय आहे. त्यात दंगल करायचे कारण काय?", असे ठाकरे म्हणाले. 

एका प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले -उद्धव ठाकरे

"गृहमंत्र्यांचे घर नागपूर आहे. आरएसएस मुख्य कार्यालय नागपूरमध्ये आहे. मग नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा?  इतकी वर्ष तुम्ही नेमकं काय केलं? जर पूर्वनियोजित असेल, तर मग तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आला असेल, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? एका प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले आहेत", असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस