शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; "मुख्यमंत्रिपदावर आहात म्हणून नाहीतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:35 IST

ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा, फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई -  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत नाहीतर त्यांची औकात काय आहे? शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना बसवलं गेलंय. शिवसेनेला फोडा, संपवा हे भाजपाचं जुनं स्वप्न आहे. त्यांनी बरेच प्रयत्न केले परंतु यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमचे काही माणसं फोडून नवीन सरकार बनवलं. आता आमच्यात लोकांना एकमेकांसमोर उभं करून मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपा करतंय असा आरोप संजय राऊत यांनी करत भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.  

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंची काही ताकद नाही. शिंदेंसोबत ४० लोक गेलेत, ते शिवसेना नाही. खरी शिवसेना काय हे मुंब्र्यात दिसलं, उद्धव ठाकरे जेव्हा तिथे गेले तेव्हा संपूर्ण मुंब्रा, ठाणे रस्त्यावर आले ती खरी शिवसेना आहे. जर तुम्ही मुख्यमंत्री नसता, पोलिसांचा वापर केला नसता किंवा दिवाळी नसती तर त्या शाखेचा ताबा आमच्याकडे असता. परंतु दिवाळीत वातावरण बिघडू नये असं आम्हाला वाटलं, उद्या हेच पोलीस आमचे आदेश मानतील तेव्हा काय कराल? एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक ही शिवसेना नाही तर गँग आहे, चोरांची टोळी आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.

तसेच, ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा, फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल, भाजपाने तुमचा बार उडवला आहे. ३१ डिसेंबरनंतर बोलावे. भाजपाच्या गुलामांनी, दिल्लीतल्या चरणदासाने मराठी माणसांची, महाराष्ट्राची बेअब्रू केलीय त्यांनी शिवसेनेला ज्ञान पाजळू नये. मुंब्रा इथं गेलो, हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते, पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे सत्ता आणि पोलीस नसते तर चित्र वेगळे दिसले असते. दिवाळी आहे आम्ही संयम पाळला त्यासाठी उपकार मानले पाहिजे असं टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

दरम्यान, आम्ही कायदेशीर लढाई करतोय, दोन जण भांडणे करतील आणि तिथे जाऊन आपण आपले काम करू ही भाजपाची नीती आहे. फोडा आणि राज्य करा हा भाजपाचा विचार आहे. राष्ट्रवादाचा विचार नाही. जातधर्माच्या आधारे देश आणि राज्ये फोडायची आणि सरकार चालवायचा हे भाजपाचे काम आहे. भाजपा काय आहे? त्यांच्याकडे काय विचार आहे? एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपा विचाराचे प्रचारक आहेत? सत्ता आणि पैसा, आपापल्या उद्योगपतींना धनाढ्य बनवणे आणि लोकांना गरीब बनवणे हा भाजपाचा विचार आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा