शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:25 IST

पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवारांना करणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलं.

मुंबई - मी २९ वर्षापासून भाजपाचं काम करतोय त्यामुळे सांगतो की, उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत. त्यांनी सारेकाही सोडून दिलंय. कौटुंबिक प्रेमात सगळं विसरले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कतृत्वाला बगल देऊन ते आपलं कार्य करतायेत. त्यांच्याबद्दल जास्त बोलता येत नाही. सध्या उद्धव ठाकरेंचे जे काही सुरू आहे ते गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका कोणती हे कळत नाही असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, विश्व हिंदु परिषदेचे, संघाचे कार्यकर्ते शिवसेनेत गेले माहिती नाही. आजकाल इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची पद्धत सुरू केली आहे. संभाजी बिग्रेड जे संघविचाराचे, विश्व हिंदु परिषदेचे कट्टर विरोधक आहेत त्यांच्याशी युती करतात. दुसरीकडे अशी भाषा वापरतात. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व खरेच बेगडी आहे. शरद पवार आणि काँग्रेस सोबत बसणाऱ्यांनी हिंदुत्वाच्या बाता मारु नये असंही त्यांनी म्हटलं. 

तसेच शरद पवार यांनी यापूर्वी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला आहे परंतु कधीही ६० च्या वर गेले नाहीत. आतापर्यंत त्यांचे राजकारण पाहिले तर जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा कुणाला तरी तोडून, जोडून सत्तेत आलेत. त्यामुळे ते किती फिरले हे महत्त्वाचं नाही. कोरोना संकटात उद्धव ठाकरेंकडेही फिरण्याची संधी होती. लोक मरत असताना ते फिरले नाहीत. आता फिरतायेत. पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता करणार आहे असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?शिवसेनेत रोजच प्रवेश होतायेत. मला अभिमान वाटतो की, सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेशासाठी रांग लागते. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसतंय. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म नाही. याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेकडे येतायेत. भाजपानं आम्ही हिंदुत्व तोडलं असा आरोप केला. त्याला छेद देणारी आजची घटना आहे. बजरंग दल, विश्व हिंदु परिषदेप्रमाणेच बहुजन, वंचित, मुस्लीम बांधवही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातलं हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरे