शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

भाजपानंही शत्रू न वाढवता आता...; उद्धव ठाकरेंनी पुढे केला मैत्रीचा हात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:40 IST

मुख्यमंत्रिपद मला आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या म्हणून मला ते करावं लागलं असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुंबई - आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकुमशाही आली असे मी म्हणणार नाही. परंतु ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता ही लक्षणं काही बरी नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. देशातील सर्व राज्यांनी एकत्र यायला हवं. एकदा लढा उभा राहिला की देश जागा होईल. भाजपानेसुद्धा अधिक शत्रू न वाढवता ज्याला आपण आरोग्यदायी राजकारण म्हणतो असं हेल्दी पॉलिटिक्स करावं असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून केले आहे. 

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा आणि आम्ही मित्रच होतो. २५-३० वर्षे आम्ही सोबतच होतो. तरीसुद्धा २०१४ ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेले नव्हतं आणि आजही सोडलेले नाही. तेव्हासुद्धा भाजपाने शेवटच्या क्षणाला शिवसेनेशी युती तोडली होती. त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो. २०१९ ला काय मागत होतो? मी अडीच वर्षासाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रिपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं. ते मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी नव्हतं. मी हे का मागितले? कारण सरत्या काळामध्ये शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणाले लागेल. कारण मी मुख्यमंत्री बनेन असं म्हणालो नव्हतो. मुख्यमंत्रिपद मला आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या म्हणून मला ते करावं लागलं असं बरं झालो मुख्यमंत्री, कारण मी आता होऊन गेलेलो आहे काय प्रॉब्लेम तुम्हाला? तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. 

भाजपाचे जुनेजाणते नेते आजही संपर्कातदेवेंद्र फडणवीसांसोबत भाजपा असे का वागले समजत नाही. तो त्यांच्या पक्षांतर्गत विष. आहे. त्यांच्या पक्षातील जुनेजाणते निष्ठावान त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपासोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला गैरसमज करू द्यायचा नाही. त्यांना शिवसेनेसोबत यायचं आहे. मी उगाच पोकळ दावा करणार नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपाचे काम करताहेत. बाहेरच्यांना सर्व दिलं जातंय त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसं बसवली. विधान परिषदेत तेव्हाचे विरोधी पक्षनेते, आता मुख्यमंत्री इतर पदांवरही बाहेरचे तरीही ते निष्ठा म्हणून काम करत आहेत असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा