शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक खेळी! २१ समाजवादी पक्षाची उद्धव ठाकरेंना साथ; भाजपावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 16:46 IST

सगळे समाजवादी विचारांचे मला कुटुंबप्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

मुंबई – २०१२ साली करुन दाखवलं या शब्दामुळे विरोधकांचा सुफडा साफ झाला. जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे विचित्र रसायन होते, एकमेकांसोबत टोकाने लढले. परंतु ती विचारांची लढाई होती. त्या दोघांची मैत्री कायम होती. जॉर्ज फर्नांडिसांचे एक वैशिष्ट होते. त्यांच्यासमोर उभं राहण्याचा डिपॉझिट जप्त व्हायचे. आम्ही लोकशाही वाचवणारच हे देशातील सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच देशातील लोकशाही वाचेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसांनी एकत्र येत साथ दिली तर महाराष्ट्राची ताकद काय हे दिसून येईल. कामगारांचे हित हा शरद राव आणि आमच्यातील एक समान धागा होता. आमच्याकडे महापालिका होती, कामगारांच्या हितासाठी आम्ही एकत्रित मधला मार्ग काढायचो. आज देशासमोर अंधार आहे. आणीबाणीच्या काळात अंधेरे मे जयप्रकाश म्हटलं जायचं. तसं आता आपल्याला व्हायचे आहे. शिवसेना-समाजवादी सुरुवातीला एकत्र होते, त्यानंतर बरीच वर्ष दुरावलो. त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने विचार करायला तुम्ही सोबत आला त्याबद्दल ठाकरेंनी धन्यवाद म्हटलं.

त्याचसोबत सगळे समाजवादी विचारांचे मला कुटुंबप्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही. माझा उल्लेख करताना माजी मुख्यमंत्री केला गेला, मला मुख्यमंत्री आजी-माजी काय मानता यापेक्षा तुम्ही कुटुंबप्रमुख मानता याचे महत्त्व आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही कोरोना काळातील टॅगलाईन होती. आज मला महात्मा फुलेंची पगडी आणि घोंगडी दिली. मी ती हातात द्यावी असं म्हटलं. कारण पगडी पेलवण्यासाठी डोकं असावं लागते. आज रिकामी डोकी खूप आहेत. त्या टोपीखाली दडलंय काय असं होते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

२१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत आले हे माझे भाग्य

शिवसेनाप्रमुख मला नेहमी म्हणायचे, उद्धव एक लक्षात ठेव, केवळ तू लोकांना आवडावा म्हणून खोटा मुखवटा घालू नकोस. मी जसा आहे तसा आहे, एकतर स्वीकारा अन्यथा नकारा. मी त्यारितीने पुढे जातो. २१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझे भाग्य आहे. आपली लढाई ही व्यक्तिगत नव्हती, तर विचारांची होती. आज आपण सगळे एकत्र जमलोय, जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आता एका वळणावर उभे आहोत. कार्यकर्ता हा आपला कणा आहे. आमच्या संघटनेत गटप्रमुख सगळ्यात महत्त्वाचा असतो. तळागळापासून वरपर्यंत एक जिद्द असेल तर लढाई जिंकता येते. आम्ही भाजपासोबत २५ वर्ष एकत्र होतो, मग दूर का झालो? मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. सत्ता येताना सगळे जवळ येतात. परंतु सत्ता नसताना जे येतात ती खरी मैत्री. भाजपाला मैत्री जमली नाही. दुसऱ्याला मोठा होऊ द्यायचा नाही. शिवसेना-भाजपा युती फोडायचे कारण काय होते? असा सवाल ठाकरेंनी विचारला.

तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय?

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूवर फुलांचा वर्षाव भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवादीशी का बोलू शकत नाही. समाजवादी देशाच्या बाहेरून आलेत का? तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही मतभेद गाडलेत. समाजवादी आमच्यासोबत आलीय. ते देशावर प्रेम करणारे आहेत. पाकिस्तानात जाऊन आम्ही प्रचार करत नाही. देशावर प्रेम करणारे लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेत. मग तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा टोलाही ठाकरेंनी भाजपाला लगावला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv Senaशिवसेना