शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

ऐतिहासिक खेळी! २१ समाजवादी पक्षाची उद्धव ठाकरेंना साथ; भाजपावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 16:46 IST

सगळे समाजवादी विचारांचे मला कुटुंबप्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

मुंबई – २०१२ साली करुन दाखवलं या शब्दामुळे विरोधकांचा सुफडा साफ झाला. जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे विचित्र रसायन होते, एकमेकांसोबत टोकाने लढले. परंतु ती विचारांची लढाई होती. त्या दोघांची मैत्री कायम होती. जॉर्ज फर्नांडिसांचे एक वैशिष्ट होते. त्यांच्यासमोर उभं राहण्याचा डिपॉझिट जप्त व्हायचे. आम्ही लोकशाही वाचवणारच हे देशातील सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच देशातील लोकशाही वाचेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसांनी एकत्र येत साथ दिली तर महाराष्ट्राची ताकद काय हे दिसून येईल. कामगारांचे हित हा शरद राव आणि आमच्यातील एक समान धागा होता. आमच्याकडे महापालिका होती, कामगारांच्या हितासाठी आम्ही एकत्रित मधला मार्ग काढायचो. आज देशासमोर अंधार आहे. आणीबाणीच्या काळात अंधेरे मे जयप्रकाश म्हटलं जायचं. तसं आता आपल्याला व्हायचे आहे. शिवसेना-समाजवादी सुरुवातीला एकत्र होते, त्यानंतर बरीच वर्ष दुरावलो. त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने विचार करायला तुम्ही सोबत आला त्याबद्दल ठाकरेंनी धन्यवाद म्हटलं.

त्याचसोबत सगळे समाजवादी विचारांचे मला कुटुंबप्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही. माझा उल्लेख करताना माजी मुख्यमंत्री केला गेला, मला मुख्यमंत्री आजी-माजी काय मानता यापेक्षा तुम्ही कुटुंबप्रमुख मानता याचे महत्त्व आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही कोरोना काळातील टॅगलाईन होती. आज मला महात्मा फुलेंची पगडी आणि घोंगडी दिली. मी ती हातात द्यावी असं म्हटलं. कारण पगडी पेलवण्यासाठी डोकं असावं लागते. आज रिकामी डोकी खूप आहेत. त्या टोपीखाली दडलंय काय असं होते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

२१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत आले हे माझे भाग्य

शिवसेनाप्रमुख मला नेहमी म्हणायचे, उद्धव एक लक्षात ठेव, केवळ तू लोकांना आवडावा म्हणून खोटा मुखवटा घालू नकोस. मी जसा आहे तसा आहे, एकतर स्वीकारा अन्यथा नकारा. मी त्यारितीने पुढे जातो. २१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझे भाग्य आहे. आपली लढाई ही व्यक्तिगत नव्हती, तर विचारांची होती. आज आपण सगळे एकत्र जमलोय, जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आता एका वळणावर उभे आहोत. कार्यकर्ता हा आपला कणा आहे. आमच्या संघटनेत गटप्रमुख सगळ्यात महत्त्वाचा असतो. तळागळापासून वरपर्यंत एक जिद्द असेल तर लढाई जिंकता येते. आम्ही भाजपासोबत २५ वर्ष एकत्र होतो, मग दूर का झालो? मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. सत्ता येताना सगळे जवळ येतात. परंतु सत्ता नसताना जे येतात ती खरी मैत्री. भाजपाला मैत्री जमली नाही. दुसऱ्याला मोठा होऊ द्यायचा नाही. शिवसेना-भाजपा युती फोडायचे कारण काय होते? असा सवाल ठाकरेंनी विचारला.

तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय?

गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूवर फुलांचा वर्षाव भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवादीशी का बोलू शकत नाही. समाजवादी देशाच्या बाहेरून आलेत का? तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही मतभेद गाडलेत. समाजवादी आमच्यासोबत आलीय. ते देशावर प्रेम करणारे आहेत. पाकिस्तानात जाऊन आम्ही प्रचार करत नाही. देशावर प्रेम करणारे लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेत. मग तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा टोलाही ठाकरेंनी भाजपाला लगावला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv Senaशिवसेना