Uddhav Thackeray On Eknath Shinde: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना, मविआचे नेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. नागपूर अधिवेशनात दुसऱ्या दिवशी हजर राहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे जळजळीत वक्तव्य केले, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
उद्धव ठाकरेंची दुसऱ्या दिवशी उपस्थिती आणि एकनाथ शिंदेंची 'अरायवल' टीका
उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी दुसऱ्या दिवशीही विधान परिषदेत उपस्थिती लावली. त्यांची ही उपस्थिती राजकीय विरोधकांसाठी चर्चेचा विषय ठरली. उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी याबद्दल विचारणा केली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मिश्किलपणे 'अरायवल' म्हणजेच आगमन अशी प्रतिक्रिया दिली होती. शिंदेंची ही प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवर केलेली अप्रत्यक्ष टीका मानली जात होती.
उद्धव ठाकरेंचा 'गुलाम-गांडूळ' हल्ला
एकनाथ शिंदे यांच्या याच 'अरायवल' टीकेबद्दल जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारले गेले, तेव्हा त्यांनी अत्यंत संतप्त आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. "गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, आणि गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. हे कुणीतरी त्यांना सांगा," अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सुनावलं.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/891535833301770/}}}}
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेत फूट पडल्यापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. न्यायालयीन लढाई, पक्षचिन्हाची लढाई आणि एकमेकांवर सतत टीकाटिप्पणी सुरू असते. ठाकरे यांच्या या जळजळीत टीकेमुळे, हिवाळी अधिवेशनातील राजकीय संघर्ष आणखी वाढणार आहे. आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाकडून या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Uddhav Thackeray sharply criticized Eknath Shinde during the winter session. Responding to Shinde's 'arrival' comment, Thackeray retorted that a slave shouldn't react. The political feud escalates.
Web Summary : शीतकालीन सत्र में उद्धव ठाकरे ने एकनाथ शिंदे की तीखी आलोचना की। शिंदे की 'आगमन' टिप्पणी पर ठाकरे ने पलटवार करते हुए कहा कि गुलाम को प्रतिक्रिया नहीं देनी चाहिए। राजनीतिक कलह बढ़ी।