शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

उद्धव ठाकरेंची देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहात महाविकासआघाडी मुद्दा लावून धरणार

By योगेश पांडे | Updated: December 20, 2022 19:34 IST

उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

नागपूर : विधीमंडळात नागपुरातील नासुप्रच्या भूखंडाचे प्रकरण पेटल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या राजिनाम्यासाठी मैदानात उतरले आहेत. राजा चुकला तर त्याचे फटके जनतेला बसतात. ज्या पद्धतीने राज्यातील सरकारचे काम सुरू आहे, त्यावरून राजा चुकत असल्याचे दिसत आहे व ते सांगणे आमचे कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजिनाम्याची मागणी केली.

नासुप्रच्या भूखंडाबाबत नागपूर खंडपीठाने दिलेला स्थगिती आदेश गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जुना विषय इतका सोपा असेल तर इतकी वर्ष कोर्टात का होता व त्याला स्थगिती का देण्यात आली आहे याचे त्यांनी उत्तर द्यावे. स्थगिती देताना प्रकरणी न्यायप्रविष्ट विषय असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचं सांगितलं आहे. ज्या खात्याचा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारकडून बाजू मांडली जाणार असेल तर त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोप झाल्यावर याआधीही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यंत्रणेवर अवाजवी दवाब असता कामा नये. जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर त्या व्यक्तीने पदावर राहणं योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकासआघाडी हा मुद्दा सभागृहात लावून धरणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

आमदारांच्या निधीला कात्री लावण्यात आली व तो विषयदेखील महत्त्वाचा आहे. सरकारने आता आश्वासन दिले असले तरी आमदारांच्या निधीतील विषमता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणाग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे वातावरण वेगळे असते. तेथे पक्षापेक्षा स्थानिक बाबी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तेथील यश-अपयश पक्षाचे नसते. त्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकार घाबरटसीमाप्रश्नावरदेखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सीमाप्रश्नाच्या आंदोलनात अगोदर लाठ्याकाठ्या खाल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. मग आता ते गप्प का आहेत. मराठी माणूस कर्नाटकच्या सरकारचा मार खातो आहे. आता सरकार ठोस भूमिका घेणार नाही का असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकार घाबरट असून कर्नाटकच्या नेत्यांनी डोळे दाखविले तर माघार घेतली, अशी टीकादेखील त्यांनी केली.

राज्यपालांनी स्वत:हून रामराम ठोकावाराज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या नेतृत्वाला मी काय करू असे विचारत आहेत. महाराष्ट्राचा त्यांनी अपमान केला असून त्यांच्याबाबत राज्यात असंतोष आहे. त्यांच्या लाज शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून रामराम ठोकावा, असे उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केले.

मोर्चा ‘फडणवीस साईज’चादेवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीच्या मुंबईतील मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटले होते. त्याबाबत विचारणा केली असता तो मोर्चा ‘फडणवीस साईज’चा असल्याचे ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर