शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

उद्धव ठाकरेंची देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहात महाविकासआघाडी मुद्दा लावून धरणार

By योगेश पांडे | Updated: December 20, 2022 19:34 IST

उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

नागपूर : विधीमंडळात नागपुरातील नासुप्रच्या भूखंडाचे प्रकरण पेटल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या राजिनाम्यासाठी मैदानात उतरले आहेत. राजा चुकला तर त्याचे फटके जनतेला बसतात. ज्या पद्धतीने राज्यातील सरकारचे काम सुरू आहे, त्यावरून राजा चुकत असल्याचे दिसत आहे व ते सांगणे आमचे कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजिनाम्याची मागणी केली.

नासुप्रच्या भूखंडाबाबत नागपूर खंडपीठाने दिलेला स्थगिती आदेश गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जुना विषय इतका सोपा असेल तर इतकी वर्ष कोर्टात का होता व त्याला स्थगिती का देण्यात आली आहे याचे त्यांनी उत्तर द्यावे. स्थगिती देताना प्रकरणी न्यायप्रविष्ट विषय असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचं सांगितलं आहे. ज्या खात्याचा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारकडून बाजू मांडली जाणार असेल तर त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोप झाल्यावर याआधीही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यंत्रणेवर अवाजवी दवाब असता कामा नये. जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर त्या व्यक्तीने पदावर राहणं योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकासआघाडी हा मुद्दा सभागृहात लावून धरणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

आमदारांच्या निधीला कात्री लावण्यात आली व तो विषयदेखील महत्त्वाचा आहे. सरकारने आता आश्वासन दिले असले तरी आमदारांच्या निधीतील विषमता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणाग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे वातावरण वेगळे असते. तेथे पक्षापेक्षा स्थानिक बाबी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तेथील यश-अपयश पक्षाचे नसते. त्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकार घाबरटसीमाप्रश्नावरदेखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सीमाप्रश्नाच्या आंदोलनात अगोदर लाठ्याकाठ्या खाल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. मग आता ते गप्प का आहेत. मराठी माणूस कर्नाटकच्या सरकारचा मार खातो आहे. आता सरकार ठोस भूमिका घेणार नाही का असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकार घाबरट असून कर्नाटकच्या नेत्यांनी डोळे दाखविले तर माघार घेतली, अशी टीकादेखील त्यांनी केली.

राज्यपालांनी स्वत:हून रामराम ठोकावाराज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या नेतृत्वाला मी काय करू असे विचारत आहेत. महाराष्ट्राचा त्यांनी अपमान केला असून त्यांच्याबाबत राज्यात असंतोष आहे. त्यांच्या लाज शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून रामराम ठोकावा, असे उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केले.

मोर्चा ‘फडणवीस साईज’चादेवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीच्या मुंबईतील मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटले होते. त्याबाबत विचारणा केली असता तो मोर्चा ‘फडणवीस साईज’चा असल्याचे ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर