शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

'सोम्या-गोम्या' वरून रंगला सामना; संजय राऊतांनी घेतला अजित पवारांचा खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 12:00 IST

इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आले नव्हते असं राऊतांनी म्हटलं आहे.

मुंबई - Sanjay Raut on Ajit Pawar ( Marathi News ) राज्यातील राजकीय आखाड्यात आता पुन्हा अजित पवार-संजय राऊत समोरासमोर आले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश मोर्चा सांगता सभेत संजय राऊतांनीअजित पवारांवर टीका केली होती. अजितदादांची मिमिक्री करत राऊतांनी आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल.हवा बहुत तेज चल रही है, अजितराव टोपी उडी जाएगी असं विधान केले होते. 

संजय राऊतांच्या टीकेवर पुण्यात पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला होता. त्यावर मी सोम्या गोम्यानं बोललेलं त्यावर उत्तर देत नाही असं सांगत एका वाक्यातच राऊतांची खिल्ली उडवली. त्यानंतर पुन्हा अजित पवारांच्या उत्तरावर राऊतांनी पलटवार केला आहे. अजितदादांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे. जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही. सोमे गोमे कोण हे २०२४ ला कळेल. हे मी वारंवार सांगतोय असं संजय राऊतांनी म्हटलं. 

तसेच महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, राज्यातील उद्योग पळवले जाताना, रोजगार पळवले जातायेत. महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकारमधील हौसे, नवसे आणि गवसे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर  बोलण्याचा अधिकारच नाही. इतके नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाले नसतील. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय. डोळ्यासमोर मुंबई तोडली जातेय. मुंबई-पुण्यातील उद्योग गुजरातला पळवले जात असताना केवळ आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटतायेत. त्यांनी आमच्यावर बोलूच नये असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

दरम्यान, टेस्ला, पाणबुडी तसेच त्याआधीचे प्रकल्प असतील असे अनेक प्रकल्प डोळ्यासमोर जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री डोळ्यावर कातडे आणि तोंडावर कुलुप लावून बसले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आले नव्हते. इतिहासात आणि भविष्यात कधी येणार नाही. या महाराष्ट्राचा रोजगार ओरबडून नेला जातोय. तुम्हाला गुजरात सोन्याने मढवायचा असेल तर मढवा, पण तुम्ही महाराष्ट्र कशाला लुटताय?. महाराष्ट्र  लुटता यावा यासाठी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले गेले. शिवसेना फोडली, आमदार फोडले हे केवळ मुंबई, महाराष्ट्राची लूट करता यावी यासाठीच करण्यात आले आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारBJPभाजपा