शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:13 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. 

छत्रपती संभाजीनगर - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. नुकतेच पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा देत पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर येथील शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. स्वामी यांच्यासोबत पक्षातील ३५ पदाधिकाऱ्यांनीही सोडचिठ्ठी दिली आहे.

पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

पक्षात मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करून विश्वनाथ स्वामी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे

शिवा लुंगारे - उपजिल्हाप्रमुखप्रकाश अत्तरदे - माजी नगरसेवकसाहेबराव घोडके - ज्येष्ठ शिवसैनिक राजू खरे - ज्येष्ठ शिवसैनिकसुदाम देहाडे - विभागप्रमुखनागनाथ स्वामी - विभागप्रमुखरोहिदास पवार - शाखाप्रमुखप्रकाश हांडे - उपविभाग प्रमुखशिवशंकर स्वामी - उपशाखाप्रमुखमनोहर विखणकर - गटप्रमुखअजिंक्य देसाई - गटप्रमुखपंतू जाधव - गटप्रमुखमनोज नर्बदे - शिवसैनिकअनंत वराडेवसंत देशमुखसुभाष नेमानेरमेश गल्हाटेगौतम भारस्करविठ्ठल सोनवणेतुकाराम घोडजकररवी बनकररोहित स्वामी - युवासेना उपशहरप्रमुखराहुल पाटील - उपशाखाप्रमुखयोगेश चौधरी - उपशाखाप्रमुखबाबू स्वामी - गटप्रमुखआकाश बिडवे - युवासेनानिखिल पडूळ - युवासेनाचैतन्य जोशी - युवासेनाऋषिकेश भालेराव - युवासेनातुषार पाथ्रीकर - युवासेनामयुरेश जाधव - युवासेनारोहन स्वामी - युवासेनासूर्यकांत मानकापे - युवासेनाआयुष शेडगे - युवासेनासर्वज्ञ पोफळे - युवासेना 

सोमवारीच एकनाथ पवारांनी दिला राजीनामा

ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी सुषमा अंधारे, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत पक्ष सोडला आहे. एकनाथ पवार यांनी नांदेडमधल्या लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. माझ्या पक्षातील काही लोकांनी पराभूत करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. कालच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि आज छत्रपती संभाजीनगरमधील शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना