शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: दहीहंडी म्हणजे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही, राज ठाकरेंच्या खोचक टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:06 IST

Uddhav Thackeray Criticize Raj Thackeray: मनसेने दहीहंडी साजरी केल्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ठाणे  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दहीहंडी साजरी करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र याविरोधात मनसेने रणशिंग फुंकत दहीहंडी साजरी केली होती. तसेच त्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काही जणांनी दहीहंडी साजरी केल्याचं ऐकलं. पण दहीहंडी हे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लागावला.

ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या काळातील दहीहंडीच्या आठवणी जागवल्या. तसेच नियम मोडून दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसेला आणि राज ठाकरेंनाही टोला लगावला. आज काही जणांनी दहीहंडी साजरी केली. हे करा नाही तर आम्ही अमूक करू, असा इशारा त्यांनी दिला होता. पण दहीहंडी म्हणजे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही. ज्यामध्ये कोरोनाचे नियम मोडले आणि आम्ही करून दाखवलं. तुम्ही काही स्वातंत्र्य नाही मिळवलंय. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर तो भाग वेगळा होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नसल्याचा पुनरुच्चार केला. काही नियम पाळावे लागतात. नियम पाळले नाही तर तिसऱ्या लाटेचा इशाा दिला आहे, असे ते म्हणाले. यावेळी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना यांना यात्रा काढायच्या आहेत.  नवीन काही सोई सुविधा करायच्या नाही आहेत. पण लोकांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील, असे सभा समारंभ करायचेत.  का तर जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. तुम्हाला कशाला हवेत जनतेचे आशीर्वाद? जनतेचा जीव धोक्यात घालायला का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे