शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: शिवसैनिकांनो खचू नका, ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 20:50 IST

आज जी दयनीय अवस्था शिंदे गट आणि भाजपाची झालीय त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आम्ही लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. चोरबाजाराला मान्यता मिळणार असेल तर बाकीच्या बाजारांना अर्थ नाही. शिवसैनिकांनो खचू नको, मी खचलो नाही. ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागेल. विजय आपलाच होईल. मैदानात उतरलो आहे आता विजयाशिवाय माघारी परतायचे नाही. नामर्दांना चोरी पचली वाटत असेल पण ती पचणार नाही. जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. 

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव सुरु असताना आता देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून लोकशाही संपवून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याची घोषित करावं. देशातील लोकशाही संपली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाली असं बोलण्याचं धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवावं असं आव्हान त्यांनी दिले आहे. 

स्वत: लढण्याची हिंमत नाहीही लढाई गेल्या ६ महिन्यापासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये अशी आमची भूमिका होती. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्ष कुणाचा हे ठरत नाही. धनाढ्य माणूस लोकप्रतिनिधींना विकत घेऊन पक्षावर वर्चस्व निर्माण करू शकतो. जसे न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तसे निवडणूक अधिकारी प्रक्रिया नेमण्याची गरज आहे. आज जी दयनीय अवस्था शिंदे गट आणि भाजपाची झालीय त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. महापालिकेपासून सर्व निवडणुका एकत्र घ्या. कदाचित महिनाभरात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाण आमचाच मुंबईच्या हातात कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभी करायची आहे. कदाचित उद्या मशाल चिन्हावरही दावा करतील. आता मशाल पेटली आहे. प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. जे धनुष्यबाण घेतले ते कागदावरचे आहे. आता शिवसेना संपली असं अनेकांना वाटत असेल. शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाण आमच्याकडे आहे. याचे तेज आणि शक्ती गद्दारांना दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

हा सगळा ठरवलेला कटरामाकडे, रावणाकडे धनुष्यबाण होता. पण विजय रामाचा झाला. सत्याचा विजय नेहमी होत आला आहे. अन्यायाविरोधात जे पेटून उठलेत त्यांचा विजय होईल. हा अत्याचार लोकशाहीवर होतोय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, धुतराष्ट्राचा नाही. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. अपात्रतेबाबत घटनातज्ञांनुसार सदस्यांचे अपात्र होऊ शकतात. हा ठरवलेला कट आहे का? धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ओरबाडून घेऊ शकत नाही. नामर्द कितीही माजला तरी तो मर्द होत नाही अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा