शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:33 IST

Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांचा 'दगाबाज रे' शेतकरी संवाद दौरा सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. शेतकरी हा भोळाभाबडा आहे, पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका. मराठवाड्यात मोठी आपत्ती आली असताना राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. दिवाळीपूर्वी मदत देऊ म्हणाले, पण मदतीच्या नावावर आळस करत आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

आता जे मुख्यमंत्री आहेत ते पंचांग काढून बसले आहेत. राहु कुठे आहे केतु कुठे आहे? ते बघत आहेत. त्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी आहे. बिहारमध्ये बसता बसता पडले, पडता पडता बसले तो भाग वेगळा. आता त्यांनी मुहूर्त काढला आहे पुढच्या वर्षीच्या जूनचा. जूनमध्ये कर्जमुक्ती करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे की नाही? कर्जमुक्ती होणार असेल तर हप्ते का भरायचे? सगळ्या कर्जाची माफी जूनमध्ये होणार आहे का? आपले सरकार आले. छत्रपती महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली. मला कुणी ढ म्हणू द्या, अडाणी म्हणू द्या, पण मी अभ्यास न करता दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे 

मराठवाड्यात इतिहासात कधी नव्हे इतकी भीषण नैसर्गिक आपत्ती आलेली असताना, राज्य सरकार केवळ 'अभ्यास' करण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. पीक विमा कंपन्या दोन-तीन रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. एका शेतकऱ्याला तर केवळ ८९ रुपये मिळाले. तर दुसरीकडे विदेशी समिती स्वदेशी शेतकऱ्यांची वाट लावणार आहे, असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शेतकरी हताश झाला आहे, त्याला आता मदत केली नाही तर तो संकटात जाईल. हे खोटे बोलणारे सरकार आहे. न्याय मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे.  शेतकरी म्हणून एकत्र आलो तरच न्याय मिळणार आहे. शेतकरी जमिनीतून कोंब फोडू शकतो, तर राज्य सरकारला नक्कीच फोडणार. जूनमध्ये कर्जमाफी जाहीर केली आहे म्हणजे कोपराला गूळ लावणे आहे. कोपराला गूळ लावला की तो चाटताही येत नाही आणि गूळ आहे म्हणून काढता येत नाही. जर सरकार दगाबाज असेल तर त्यांच्याशी दगा केला पाहिजे. त्यांना सांगा आधी कर्जमुक्ती द्या मग आम्ही तुम्हाला मते देऊ. माझा शेतकरी अन्नदाता आहे, कर्जमुक्ती केली तरच मते देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Slams Government's Delay in Farmer Aid, Questions Motives

Web Summary : Uddhav Thackeray criticizes the state government for delaying aid to farmers affected by natural disasters. He questions their motives and demands immediate debt relief, not promises for June.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी