शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:31 IST

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई : टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू  नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरज चोप्राचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केले जाणार आहे. मुंबईत त्याचे भव्य स्वागत होणार आहे, अशी माहिती कुटुंबातील सदस्याने दिली. 

याचबरोबर, मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी सांगितले. हरयाणातील खांदरा हे नीरज चोप्राचे मूळ गाव आहे. 13 ऑगस्टला नीरज चोप्रा आपल्या गावात येणार आहे. त्यामुळे गावातही सध्या उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी इतिहासात आतापर्यंत झाले नाही, असे सेलिब्रेशन करणार असल्याचे  नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच, कुटुंबीयांनी आपले मराठी कनेक्शनही सांगितले.

महाराष्ट्राशी नाते! नीरज चोप्रा याने टोकिओत सुवर्णपदक जिंकले आणि हरयाणा, दिल्लीत नीरज चोपडे यांचे अभिनंदन, असे संदेश सुरू झाले. त्याचे कारण पानिपतजवळच्या खंदरा गावचा रहिवासी असलेल्या नीरज चोप्राचे मूळ महाराष्ट्रात आहे. १७६४ च्या तिसऱ्या पानिपत युद्धातून वाचलेले सगळ्या जाती-समाजाचे लोक हरयाणात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. सोनीपत, पानीपत, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथल आणि जिंद या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राणे, भोसले, चोपडे, मुळे, महले वगैरे आडनावे असलेला हा समाज राहतो. शेती, दुग्धउत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. नीरजचे कुटुंबही शेतीव्यवसायातच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.

सुवर्ण उत्सव! नीरजने इतिहास घडवला!तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अ‍ॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अ‍ॅथलेटिक्स फील्ड अ‍ॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारतासाठी हा दिवस सुवर्ण उत्सवी ठरला. दुसरीकडे कुस्तीत सुवर्ण पदकाची संधी हुकल्यानंतर बजरंग पुनियाने कांस्य पदकावरील पकड अजिबात ढिली केली नाही. यामुळे भारतासाठी शनिवारचा दिवस अत्यंत जल्लोषाचा ठरला. 

नीरजने इतर खेळाडूंना दिली नाही एकही संधीअंतिम फेरी   सहापैकी दुसरा प्रयत्न सर्वोत्तमपहिला     ८७.०३ मीटरदुसरा    ८७.५८ मीटरतिसरा    ७६.७९ मीटर चौथा    फाऊलपाचवा    फाऊलसहावा    ८४.२४ मीटर

ऐतिहासिक कामगिरी २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने बिंद्राच्या कामगिरीशी बरोबरी करताना तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा दुसरा भारतीय ठरला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्राMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा