शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

आघाडीच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 20:58 IST

पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

परभणी - पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच आडीमध्ये 56 पक्ष एकत्र आले आहे. मात्र 56 पक्षच काय 56 पिढ्या जरी खाली उतरल्या तरी परभणीवरील भगवा खाली उतरणार नाही, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा आज परभणी येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या शरद पवार यांच्या विधानांचा जोरदार समाचार घेतला. ''आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादीने शेण घोटाळा केला होता. पाच वर्षांपूर्वी यांनी केलेल्या घोटाळ्यांवर मी एक पुस्तकच प्रकाशित केले होते. लोकं विसरली असतील. पण या आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे वर्णन करायला. बाराखडीही कमी पडेल,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवार बोलतात की उद्धव ठाकरे वारा येईल तशी दिशा बदलतात. याच वाऱ्यामुळे माझा भगवा ध्वज डौलाने फडकत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवरही उद्धव ठाकरे बरसले. ''राहुल गांधी सावरकरांना डरपोक बोलतात. म्हणून राहुल गांधींना सांगतोय की हा हिंदुस्तान आहे हा इटली नाही आहे.  राहुल गांधी आयुष्यात कधी पंतप्रधान होणार नाही. काँग्रेस जर क्रांतिकारकांना देशद्रोही बोलतोय. अशा कपाळकरंटकाना हा देश देऊ नका, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. ''शेतकऱ्यांसाठीच्या जाचक अटी याचा पाठपुरावा करून त्या शिवसेनेने काढून टाकल्या आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.  गेली पाच वर्षे माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांना मदत करतोय आणि तेव्हा राष्ट्रवादीवाले घराच्या आत दरवाजा लावून  बसले होते., असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेparbhani-pcपरभणीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक