शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ताेंडी संपली, आता आयाेगासमाेर ठाकरे-शिंदे गटाची लेखी ‘परीक्षा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 5:59 AM

दाेन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण; ३० जानेवारीपर्यंत लेखी निवेदन देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही आले नसून ठाकरे व शिंदे गटांनी केलेले युक्तिवाद संपले आहेत. येत्या ३० जानेवारीला दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर लेखी निवेदन सादर करावयाचे आहेत. आयोगाच्या या लेखी परीक्षेत आता पास कोण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, काही महिन्यांपासून आयोगाकडे एकनाथ शिंदे गट व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवसेना व धनुष्यबाणावर आमचाच ताबा असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या १७ जानेवारीला अपूर्ण राहिलेला युक्तिवाद आज ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी पूर्ण केला. यानंतर त्याच गटाचे देवदत्त कामत यांनी पुन्हा युक्तिवाद केला. सादिक अलीचा संदर्भ शिवसेनेसाठी लागू होत नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

चार तास युक्तिवाद

दोन्ही गटांच्या वकिलांनी आज जवळपास चार तास युक्तिवाद केला. आता युक्तिवाद पूर्ण झाले असून या दोन्ही गटांना केलेल्या युक्तिवादाचे लेखी निवेदन देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे लेखी निवेदन येत्या ३० जानेवारीपर्यंत सादर करावयाचे आहेत.

प्राथमिक सदस्य - ठाकरे गट - २० लाख / शिंदे गट - ४ लाख

ठाकरे गटाचा दावा काय होता?

  • शिवसेना पक्षाची घटना, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेनेच्या संदर्भात निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या प्रतिनिधी सभेवर ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याचा दावा या दोन्ही वकिलांनी केला. 
  • शिवसेना पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या या गटाचे आमदार व खासदारसुद्धा याच पक्षाच्या घटनेने मिळालेल्या अधिकारामुळे झालेले आहेत, याकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधले. 
  • लोकप्रतिनिधी म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी त्या पक्षाचा भाग असतात, परंतु पक्षात असलेले पदाधिकारी व नेते, उपनेतेसुद्धा पक्षाचा अविभाज्य भाग असतात. 
  • या पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर कोणताही राजकीय पक्ष उभा राहत असतो. यावर या गटाचा प्रामुख्याने भर राहिला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक असल्याचा दावा केला.

 

शिंदे गटाचा युक्तिवाद

  • शिंदे गटाकडून महेश जेठमलानी व मणिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. या गटाने लोकप्रतिनिधींची संख्या ही लोकशाही प्रणालीमध्ये कशी महत्त्वपूर्ण आहे, याची मांडणी केली. 
  • कोणत्याही पक्षाला मिळणारी मान्यता ही विधानसभा व लोकसभा निवडणुकीत किती मते मिळतात, यावर अवलंबून असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे महत्त्व बेदखल करता येणार नाही. 
  • आज शिंदे गटाकडे ४० आमदार व १२ खासदार आहेत. हे लोकप्रतिनिधी तितक्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पक्षाची मान्यता देताना जर निवडणुकीत मिळालेली मते हा महत्त्वपूर्ण निकष असेल तर शिवसेना पक्षाकडे शिंदे गटाचे लोकमत असल्याचा दावा शिंदेंच्या वकिलांनी केला. 
  • पदाधिकाऱ्यांच्या संख्येवर निवडणूक आयोग एखाद्या राजकीय पक्षाला मान्यता देत नाही, याकडे शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले.

 

शिंदे गटाने घटनेची मोडतोड केली!

शिंदे गटाने शिवसेनेच्या घटनेची मोडतोड करून सादर केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. शिवसेनेच्या घटनेत शिंदे गटाने बदल करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या मूळ घटनेत विभाग प्रमुख केवळ मुंबईतील आहे. शिंदे गटाने जळगाव इतर शहरातील विभाग प्रमुखांना प्रतिनिधी सभेत स्थान दिले, हे घटना विरोधी असल्याचा दावा सिब्बल यांनी केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग