शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“गरीबांना ‘आनंद शिधा’ म्हणून फक्त एक किलो धान्य, जाहिरातींवर मात्र कोट्यवधींची..,” ठाकरे गटाची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 08:17 IST

सरकारचा कारभार वेगवान, गतिमान वगैरे असल्याचा त्यांचा दावा असून सरकारी तिजोरीवर डल्ला मारून जनतेवर जाहिरातींचा भडिमार केला जात असल्याचा केला आरोप.

‘गरीबांना ‘आनंद शिधा’ म्हणून फक्त एक किलो धान्य आणि जाहिरातींवर मात्र कोटय़वधींची उधळण, असा मिंधे-फडणवीस सरकारचा ‘गतिमान’ कारभार सुरू आहे. जाहिरातींमधून निर्माण होणारा भ्रम वेगळा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी,’ असे म्हणत ठाकरे गटाकडून सरकारवर टीकेचा बाण सोडण्यात आला.

‘जाहिरातींमधील पात्रांपेक्षा गारपिटीने मोडून पडलेल्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन विचारा, ते मिंधे सरकारचा ‘पंचनामा’ करताना दिसतील. महागाईने त्रस्त आयाबहिणी त्यांच्या नावाने बोटे मोडताना दिसतील. हे सरकार कागदावरील ‘आनंद शिध्या’त मश्गूल आहे आणि राज्यातील गोरगरीब जनता ‘कसला आनंद आणि कसला शिधा’ या विवंचनेत आला दिवस ढकलत आहे. सरकार तिच्या ओंजळीत ना आनंद घालीत आहे ना शिधा!,’ असे नमूद करत ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना-भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हटलेय अग्रलेखात?राज्यातील मिंधे सरकारचा कारभार वेगवान आणि गतिमान वगैरे असल्याचा त्यांचा दावा आहे. तसे भासविण्यासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला मारून जनतेवर जाहिरातींचा भडिमार केला जात आहे. त्यातून निर्माण झालेल्या ‘भ्रमाच्या भोपळय़ा’त बसून हे सरकार स्वानंदात मग्न आहे. मात्र हा भ्रमाचा भोपळा पुन्हा फुटला आहे. सरकारच्या ‘आनंद शिधा’ योजनेची परत एकदा पोलखोल झाल्याचे संपादकीयमध्ये म्हटले आहे.

एक किलो धान्यात महिना भागवा असे म्हणायचेय का?‘गुढीपाडव्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत राज्यातील गरीब जनतेला ‘आनंद शिधा’ देण्याचे नियोजन वगैरे केले असल्याचा ढोल सरकारने बडविला होता. मात्र आता हे सरकार गरीब कुटुंबांना एका महिन्याला फक्त एक किलो धान्य ‘आनंदाचा शिधा’ म्हणून देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गरीबांना मदत म्हणायची की सरकारने केलेली चेष्टा? हा आनंद शिधा म्हणायचा की गरीबांच्या जखमेवर चोळलेले मीठ? गरीब आहात ना, मग एक किलो धान्यात महिना भागवा आणि त्यातच आनंद मानून घ्या, असे मिंधे सरकारला म्हणायचे आहे का?’ असा सवालही यातून करण्यात आलाय.

नाव अर्धा शिधा ठेवास्वतःला गोरगरीबांचे, शेतकऱ्यांचे सरकार म्हणवता ना, मग निदान जे तुम्हीच सांगितले ते तरी पूर्ण द्या. योजनेचे नाव ‘आनंद शिधा’ ठेवायचे आणि देताना अर्धा शिधा देऊन गोरगरीबांचा आनंद हिरावून घ्यायचा. मग योजनेचे नाव ‘अर्धा शिधा’ ठेवा! जे सरकार गरीबांना साधा शिधा देऊ शकत नाही ते आनंद काय देणार? गेल्या आठवडय़ात गुढीपाडव्याच्या वेळीही आनंद शिध्याबाबत ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ असेच झाले. त्यासाठी त्यावेळी सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे बोट दाखविले गेले,’ असा आरोपही यातून करण्यात आलाय. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र