शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल मांडली रोखठोक भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 16:29 IST

उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ओबीसी एल्गार मेळाव्यातील इशाऱ्यावरही आपली भूमिका मांडली आहे.

सातारा -मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांनी आज साताऱ्यात पोहोचल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती उदयनराजेंनी माध्यमांसमोर दिली आहे. "मी मनोजला एवढंच सांगितलं की, तुझं कुटुंब आहे, त्यांना तुझी गरज आहे. त्यामुळे तू जगला पाहिजे," असं उदयनराजे म्हणाले. 

आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका मांडताना उदयनराजे पुढे म्हणाले की, "शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीत कोणावरही अन्याय केला नाही. आज एक व्यक्ती एवढं जे काही करतोय, ते कशामुळे करतोय? कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मी कोणत्या एका जातीचं समर्थन करत नाही. पण आज मनोज जरांगे मरायला तयार आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि त्यानंतर सर्वांना आरक्षण देण्यात यावं. मी मराठा समाजाचा म्हणून बोलत नाही, पण आज मेरिटवर आरक्षण दिलं पाहिजे, अशी सगळ्यांचीच मानसिकता झाली आहे. आज एखादा मुलगा शाळा, कॉलेजला जातो, तेव्हा तिथं आरक्षणाचा विषय निघतो. जातीजातींमध्ये तेढ कोणी निर्माण केली? हे तुम्ही शोधा. मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. जे झालं ते चुकीचं झालं," अशा शब्दांत उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

"तुम्ही प्रश्न सोडवणार नसाल तर माणसाने जगायचं कसं? नाहीतर विष पिऊन मेलेलं बरं अशी मानसिकता तयार होते. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, त्यामुळे या प्रश्नाचा राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा," अशा शब्दांत उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ओबीसी मेळाव्यातील इशाऱ्यावर काय म्हणाले उदयनराजे?

तुम्ही एक छगन भुजबळ निवडणुकीत पराभूत करणार असाल, तर आम्ही तुमचे १५० आमदार पाडू, असा इशारा काल झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून देण्यात आला होता. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले की, "पाडायचे असतील तर पाडा आमदार. अजून काय बोलू? मीच उभा राहत नाही निवडणुकीत आता. सगळ्यांना माझं मनापासून एकच सांगणं आहे की, जरा विचार करा आणि देशाचे तुकडे करू नका."

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्य शासनाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करुन आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. पण, आरक्षणासाठी त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत शासनाला मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. शनिवारी ते सातारा शहरातील सभेसाठी आले होते. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजबांधवांच्या साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार त्यांना घालण्यात आला. उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आयोजकांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती जरांगे-पाटील यांना दिली. यावेळी समाजबांधवांनी ‘जय भवानी, जय शिवाजी... एक मराठा, लाख मराठा...' अशी जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ