शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

“प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर राहावे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 16:01 IST

Maharashtra Politics: एवढे निश्चितपणे सांगतो की, महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर देशातील वातावरण तापण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. राज्यातही महाविकास आघाडी एकत्र लढण्यास इच्छूक आहे. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गटातील एका नेत्याने प्रतिक्रिया देताना, प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर राहावे, असा सल्ला दिला आहे. 

मीडियाशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. त्यावर बोलताना सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. प्रकाश आंबेडकर तळागाळात काम करणारे नेते आहेत. ते जर बोलत असतील तर त्यावर उद्धव ठाकरेंनी विचार करणे गरजेचे आहे. ठाकरे गट आणि वंचित यांनाच एकत्र यावे लागेल. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर किती कंफर्टेबल असतील मला माहिती नाही, असे उदय सामंत म्हणाले. 

महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही

काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकले आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, मी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत होतो, पण २०१४ ला राष्ट्रवादी सोडली. आता मी शिवसेनेत आहे. पण एवढे निश्चितपणे सांगतो की, महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही, असा दावा उदय सामंत यांनी केला. 

दरम्यान, कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी सरकार आमचेच येणार. त्यांच्याकडे नागनाथ-सापनाथ आहेत. पण आमच्याकडे एकनाथ आहेत, त्यामुळे आमचेच सरकार येणार आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरे