शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंद निर्णयावर संजय राऊतांचे विधान; शिंदे गटाची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:27 IST

Shiv Sena Shinde Group Vs Sanjay Raut: विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. विरोधक बदलापूर घटनेचे राजकारण करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.

Shiv Sena Shinde Group Vs Sanjay Raut: बदलापूर घटनेला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. परंतु, गुणरत्न सदावर्ते यांनी या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. तसेच असा कोणी बंद करत असेल तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला होता. संजय राऊत यांनी केलेल्या विधानांवरून शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे एक मागणी केली आहे. 

जनतेच्या भावना उच्च न्यायालयाने समजून घ्यायला हव्या होत्या. न्यायालयाने दबावाखाली निर्णय दिला, असे मी म्हणणार नाही. महाराष्ट्रात आज कुणीही सुरक्षित नाही. न्यायालयाला लेकी-बाळी आहेत. न्यायदेवताही एक स्त्री आहे. या देशात न्यायदेवतेवर अत्याचार होत आहे. न्यायालयात सरकारचा लाडका याचिकाकर्ता जातो आणि न्यायालय यावर बंदी घालते. सरकार जेव्हा अडचणीत येते तेव्हा हा लाडका याचिकाकर्ता न्यायालयात जातो. न्यायालयाचा आदेश मानणे आपली परंपरा आहे. त्यामुळे आम्ही बंद मागे घेतला, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. 

विरोधक बदलापूर घटनेचे राजकारण करत आहेत

विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. विरोधक बदलापूर घटनेचे राजकारण करत आहेत. शरद पवार परिपक्व नेते आहेत. म्हणून त्यांनी ट्विट करत बंद मागे घेण्याचे आवाहन केले. संजय राऊतांनी केलेले विधान न्यायालयावर टीका करण्यासारखे आहे. कोण याचिकाकर्ता आहे, त्यापेक्षा न्यायालयाने काय निर्णय दिला. ते महत्त्वाचे आहे. शरद पवारांनी ट्विट केले, न्यायिक व्यवस्थेचा सन्मान केला. त्यामुळे काही लोकांसमोर पर्याय उरला नाही. म्हणून शेवटच्या टप्प्यात काही लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या. न्यायालयाचा अवमान करायचा नसतो. हे त्यांच्यापैकीच एका नेत्याने दाखवून दिले आहे. कोण न्यायालयात गेले म्हणून न्यायालय निर्णय देत नाही. न्यायालयाला वाटले, न्याय्य बाजू पटली की, न्यायालय निर्णय देते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात कोण बोलणार असेल तर तो न्यायालयाचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे. संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, समाजात भांडण लावण्याचे काम विरोधक करीत आहे. सभागृहात एक तर सभागृहाच्या बाहेर ते अन्य भाषा बोलतात, अशी टीका त्यांनी महविकास आघाडीवर केली. मराठा आरक्षणाबाबत विरोधक आपली भूमिका स्पष्ट का करत नाही. बदलापूरची घटना निंदनीयच आहे. शाळा कोणाचीही असो त्यावर कारवाई केली पाहिजे आणि सरकारची भूमिका तशीच असल्याचेही ते म्हणाले. अशा घटनेतील नराधमांना ठेचून काढण्याचीच भूमिका सरकारची आहे. राज्यात महिला सुरक्षितता अभियान अधिक भक्कमपणे राबविल्या जाईल. कुठल्याही महिलेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे कठोर पाऊल सरकार उचलणार आहे. न्यायालय जेव्हा विरोधकांच्या बाजूने निर्णय देते तेव्हा विरोधकांना तो निर्णय मान्य असतो. मात्र त्यांच्या विरोधात निर्णय देते त्यावेळी त्यांना न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप असतो, असा दुटप्पीपणा विरोधक करतात. खरेतर न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भूमिका व्यक्त करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. या संदर्भात न्यायालयाने विरोधकांवर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतSanjay Rautसंजय राऊतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना