शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Monsoon in Maharashtra : आनंदसरींचे आगमन! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 06:15 IST

Two days early, monsoon arrives over Maharashtra : गेल्या वर्षी दक्षिण कोकण, कोल्हापुरात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता.  मान्सून शनिवारी हर्णे, सोलापूर, रायचूर, तिरुपती, कुडलोरपर्यंत दाखल झाला.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.

पुणे : केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मान्सूनने गेल्या दोन दिवसांत वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील हर्णैपासून सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.

गेल्या वर्षी दक्षिण कोकण, कोल्हापुरात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता.  मान्सून शनिवारी हर्णे, सोलापूर, रायचूर, तिरुपती, कुडलोरपर्यंत दाखल झाला. येत्या २४ तासांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि तमिळनाडूचा उर्वरित भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़

केरळमध्ये ३ जून रोजी आगमन झाल्यानंतर मान्सूनने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत वेगवान वाटचाल केली होती. आज त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळांनुसार दक्षिण कोकण ७ जून, कोल्हापूर ९ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र,‘मान्सून एक्स्प्रेस’ सुसाट सुटली आहे. तिने निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत देवगड २७, सोलापूर २५, परभणी ६, चंद्रपूर ८, ब्रह्मपुरी २२, नाशिक १५, मालेगाव ४, जळगाव ३, पुणे ६, पाषाण ७ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत पुणे ३, लोहगाव ३४, कोल्हापूर २, नाशिक २, सांगली १, सोलापूर १, पणजी ३, डहाणू ६, अमरावती १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हर्णै परिसरात दोन तास पाऊसदापोली (जि. रत्नागिरी) : हर्णै परिसरात दुपारी दीड वाजता मान्सून दाखल झाल्यानंतर तब्बल २ तास पावसाचा धिंगाणा सुरू होता. समुद्राच्या अजस्र लाटा अतिवेगाने किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत़. सावंतवाडी तालुक्यात तब्बल दोन तास ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. कोल्हापुरात पावसाची रिपरिप होती. साताऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

पुढील ७ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

 पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी सांगितले की, मान्सूनने आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यंदा तो काही दिवस अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात पोहचणार आहे. 

- दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह या ६ जिल्ह्यांत गेले दोन दिवस सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई, पुण्यात २४ तासांत पाऊस? आज रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पाऊस झाला आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ येथे पावसाचा शिडकावा झाला. येत्या २४ तासांत मुंबई, पुणे येथे चांगला पाऊस झाला तर मान्सून या भागात आला असे म्हणता येईल. या दोन दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत अपेक्षित इतका पाऊस झाला नाही तर मुंबई, पुण्यात मान्सूनच्या आगमनाला ६ ते ७ दिवस लागू शकतात.

येत्या २४ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागात मान्सून पुढे वाटचाल करेल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस