शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
9
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
10
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
11
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी उघड; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना केली अटक
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
13
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
14
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
15
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
16
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
17
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
18
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
19
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
20
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार

तुरीच्या हमीभावावरून विधान परिषदेत गदारोळ; शेतकऱ्यांचे वीस हजार कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:21 PM

तूर, सोयाबीन, उडीद आदी कडधान्यांचे भाव अभूतपूर्व कोसळले असून कडधान्यांना जाहीर केलेला हमीभावही मिळत नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे शेतक-यांचे वीस हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

मुंबई : तूर, सोयाबीन, उडीद आदी कडधान्यांचे भाव अभूतपूर्व कोसळले असून कडधान्यांना जाहीर केलेला हमीभावही मिळत नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे शेतक-यांचे वीस हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. कडधान्यांच्या मुद्दयावर विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे कडधान्यांनाचा मुद्दा मुंडे यांनी उपस्थित केला. तुरीला ५४५० हमीभाव जाहीर झाला असूनही शेतक-यांना चार हजाराचाही भाव मिळत नाही. शेतक-यांचे क्विंटलला दीड हजारांचे नुकसान होत आहे. राज्यात १ लाख १५ हेक्टरवर तूरीचे उत्पादन अपेक्षित आहे. नाफेडने दिलेल्या आकडेवारीनुसार १६ मार्च २०१८ अखेर केवळ १२.२ लाख क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. ४८ दिवस आता संपलेले आहेत, उरलेल्या ४२ दिवसांत ७२.७ टक्के खरेदी शासनाला करायची आहे. शासकीय गोदामात जागा नाही. कमीत कमी तूर घ्यावी, असा सरकारचा डाव आहे. कर्नाटक राज्य हमीभावावर ५०० रुपये बोनस देत असताना राज्यात किमान हमीभावाने तरी तूर खरेदी करा, अशी मागणी मुंडे यांनी केली.सरकार शेतक-यांना अजून किती नागवणार आहे, त्यांची किती ससेहोलपट करणार आहात, असा सवाल सुनिल तटकरे यांनी केला. सभापतींनी स्थगनची सूचना फेटाळली. मात्र, विरोधकांच्या प्रचंड घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.खरेदी केंद्रे पुन्हा सुरू कराराज्यातील तूर-हरभ-याची शासकीय खरेदी बंद झाली असून, व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करून शेतक-यांची लूट करीत आहेत. शेतक-यांवरील हा अन्याय रोखण्यासाठी सरकारने तातडीने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDhananjay Mundeधनंजय मुंडे