शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ माताच शिवरायांचे खरे गुरू : छत्रपती संभाजीराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 15:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे एकच होते व एकच राहणार आहेत..

ठळक मुद्देवढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केली टीका

कोरेगाव भीमा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवरायांचे गुरू हे स्वामी रामदास हे होऊच शकत नसल्याचे विधान केले होते. त्या विधानाचा संदर्भ घेत भाष्य करताना शिवरायांचे खरे गुरू हे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब याच आहेत, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. संभाजीराजे म्हणाले की, संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याच्या वंशजासंदर्भात पुरावे मागितले. भोसले यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल काय पुरावे द्यायचे? आमचे छत्रपतींचे घराणे आहे. तोंडात येईल ते काही बोलून चालत नाही. राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. वढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संभाजी महाराज बोलत होते.  ते म्हणाले, की नरेंद्र मोदींची तुलना केलेल्या वादग्रस्त पुस्तकाचा महाराष्ट्रात सर्वांत आधी निषेध केलेला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण मलीन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, फुले, आंबेडकर, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा राज्यात पुस्तकावर चर्चा सोडून दुसरीकडेच चर्चा गेली आहे. महाराष्ट्र वेगळे राज्य असून इतर राज्यांना आदर्श देण्याची आवश्यकता आहे.    ...........................प्रत्येक पक्षात अतिउत्साही लोक आहेत. पवारसाहेबांनी कधीच त्यांना जाणता राजा म्हणा, असे सांगितले नाही. तसेच, मोदी साहेब व बाळासाहेबपण कधी बोलले नाही. पण, अतिउत्साही लोक असतात त्याला कोण समर्थन करतय असही होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकच होते व एकच राहणार आहेत. भविष्यातही त्यांना कोणीच आवाहन देऊ शकणार नाही. म्हणून यात पवार, मोदी किंवा बाळासाहेबांची चूक नसून प्रत्येक पक्षात कलाकार लोक असतात त्यांची आहे.  त्यांना प्रत्येक पक्षाने आवर घालायचा असतो. शिवरायांच्या गुरूंबाबत त्यांनी राजमाता जिजाऊ याच त्यांच्या गुरू असल्याची इतिहासात नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजेंबद्दल जे आवाहन दिले जाते, पुरावे मागितले ही घटना महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. - नितेश राणे, आमदार

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीhistoryइतिहासNitesh Raneनीतेश राणे