शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

राज्यात उष्माघाताच्या १९६ रुग्णांवर उपचार, तापमानाचा पारा चढाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 03:04 IST

मान्सून जवळ येत असला, तरी सध्या मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा चढाच आहे. विदर्भ-मराठवाड्यातील तापमान उच्चांक गाठत असतानाच, अन्य भागांतील तापमानही नगारिकांसाठी तापदायक ठरत आहे.

मुंबई : मान्सून जवळ येत असला, तरी सध्या मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा चढाच आहे. विदर्भ-मराठवाड्यातील तापमान उच्चांक गाठत असतानाच, अन्य भागांतील तापमानही नगारिकांसाठी तापदायक ठरत आहे. मुंबई, ठाण्यासारख्या किनारी भागातील दमट हवेमुळे उष्माघाताचा धोका नसला, तरी कडक उन्हामुळे चक्कर येणे, अस्वस्थता ही लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचा त्रास झालेल्या १९६ रुग्णांनी राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेतले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे.

वाढत्या उकाड्याचा त्रास राज्यभर नागरिकांना जाणवू लागला आहे. उष्माघात नियंत्रण कक्षाकडील माहितीनुसार, उष्माघातामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील १९६ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याशिवाय परभणी, धुळे आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, बरेच रुग्ण उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. वेळीच काळजी घेतल्यास या उष्ण वातावरणातही तग धरता येईल. उन्हाळ्यात शेतावर किंवा मजुरीची कामे करताना शरीरातील पाणीसाठा कमी झाला की, उष्माघात होतो. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कडक उन्हाचा सामना कमी प्रमाणात करावा लागत असला, तरी उष्म्याचा त्रास या ना त्या स्वरूपात होत राहतो. अनेकांना त्यांचा शारीरिक त्रास हा उष्णतेमुळे होत असल्याचेही पटकन लक्षात येत नाही. अस्वस्थता, मानसिक गोंधळ हीदेखील याचीच लक्षणे आहेत. त्यामुळे असा त्रास जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉ.आवटे यांनी सांगितले.

काही लक्षणेसंपूर्ण शरीरच उष्माघाताचे परिणाम विविध लक्षणांद्वारे दाखविण्यास सुरुवात करते. थकवा, चक्कर, निरुत्साही वाटणे, अस्वस्थता येणे ही सुरुवातीची लक्षणे आहेत. ही लक्षणे लवकर ओळखून उपाय केले नाहीत, तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा कोरडी पडते, जीभ आत ओढली जाते. रक्तदाब वाढतो. मानसिक बैचेनी वाढते, शरीराचे तापमान वाढते.

उपचारउष्माघातामुळे किंवा अति उन्हामुळे चक्कर आल्यास अशा व्यक्तीस मोकळी हवा, सावलीत घेऊन जावे, ताप वाढत असल्यास गार पाण्याने अंग पुसावे. तहान लागल्यासारखे वाटत नसले, तरी पाणी, नारळपाणी ठरावीक अंतराने घोट घोट प्यावे. यामुळे अनेकदा बरे वाटते.

उन्हाळ्यात चहा, कॉफी ही पेय शक्यतो टाळावीत. कोणत्याही स्वरूपातील मद्य टाळावे. अतिथंड पाणी, सरबत टाळावे. त्यामुळे पोटात मुरडा पडतो, शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा वाढले की, स्नायू, मूत्रपिंड, मेंदू किंवा हृदयावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मूत्राचा रंग गडद पिवळा झाला, डोकेदुखी वाढली किंवा भोवळ आली, तर तातडीने औषधोपाचार करावेत.

प्रतिबंधात्मक उपायशरीरातील पाण्याचा साठा कमी होऊ न देणे सर्वात गरजेचे आहे. उष्मा वाढला की, सतत पाणी पिणे आवश्यक आहे. यावेळी शरीराला ग्लुकोज व क्षारांचा पुरवठा होणे गरजेचे असते. एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर व चिमूटभर मीठ टाकून केलेले जलसंजीवनी पेय यासाठी उत्तम असते. मात्र, अतिसाखरयुक्त सरबत टाळा, हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे घालावेत. उन्हात जाताना गॉगल, टोपी, छत्री वापरा.

घाम अंगावर सुकू देऊ नका. उन्हात कष्टाचे काम करू नका, काही कारणाने उन्हात थांबावे लागले, तर भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर जाड कापड गुंडाळावे. अधूनमधून सावलीत जावे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र