शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 06:22 IST

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: एमएसआरडीसीकडून उद्घाटनाची तयारी सुरु झाली असून, नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल.

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून आता या रस्त्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वेळ मागितली आहे. त्यामुळे मेच्या सुरुवातीला हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येईल. 

समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल. तसेच हा संपूर्ण ७०१ कि.मी.चा महामार्ग सेवेत दाखल होईल.  

विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा इगतपुरी ते आमने हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग खुला केला जाणार होता. मात्र या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील पुलाचे काम बाकी होते. 

तसेच समृद्धीचा शेवट होतो, त्या आमने येथून पुढे वडपेला जाण्यासाठीच्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. त्यावेळी फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता सुरू करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले होते. मात्र वडपे येथे नाशिक रस्त्याला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कनेक्टरचे काम अपूर्ण असल्याने या मुदतीत हा महामार्ग सुरू होऊ शकला नव्हता.  

मुंबई ते आमने प्रवास तूर्त अडथळ्यांचा

सध्या ठाणे-वडपे रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक संथगतीने चालते. समृद्धी महामार्ग सुरू झाला तरी या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे मुंबई ते आमने हा प्रवास तूर्त तरी अडथळ्यांचा राहणार आहे.

उद्घाटनासाठी मागितली वेळ

या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे वेळ मागण्यात आली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सद्य:स्थितीत वडपे येथे नाशिक हायवेला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कनेक्टरच्या एका पुलाचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण होण्यास दोन महिने लागतील. तोपर्यंत या भागात वाहतूक अन्य मार्गांनी वळण घेऊन वळविली जाणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

इगतपुरी ते आमने टप्पा लवकरच पूर्ण होणार

समृद्धीचा नागपूर ते शिर्डी हा ५२० कि.मी.चा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला केला होता. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.

तर गेल्या वर्षी तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ कि.मी.चा मार्ग सुरू केला होता. आता शेवटच्या टप्प्यात ७६ कि.मी.चा इगतपुरी ते आमने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूरhighwayमहामार्गMumbaiमुंबई