शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 06:22 IST

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: एमएसआरडीसीकडून उद्घाटनाची तयारी सुरु झाली असून, नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल.

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून आता या रस्त्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वेळ मागितली आहे. त्यामुळे मेच्या सुरुवातीला हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येईल. 

समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल. तसेच हा संपूर्ण ७०१ कि.मी.चा महामार्ग सेवेत दाखल होईल.  

विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा इगतपुरी ते आमने हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग खुला केला जाणार होता. मात्र या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील पुलाचे काम बाकी होते. 

तसेच समृद्धीचा शेवट होतो, त्या आमने येथून पुढे वडपेला जाण्यासाठीच्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. त्यावेळी फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता सुरू करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले होते. मात्र वडपे येथे नाशिक रस्त्याला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कनेक्टरचे काम अपूर्ण असल्याने या मुदतीत हा महामार्ग सुरू होऊ शकला नव्हता.  

मुंबई ते आमने प्रवास तूर्त अडथळ्यांचा

सध्या ठाणे-वडपे रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक संथगतीने चालते. समृद्धी महामार्ग सुरू झाला तरी या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे मुंबई ते आमने हा प्रवास तूर्त तरी अडथळ्यांचा राहणार आहे.

उद्घाटनासाठी मागितली वेळ

या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे वेळ मागण्यात आली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सद्य:स्थितीत वडपे येथे नाशिक हायवेला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कनेक्टरच्या एका पुलाचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण होण्यास दोन महिने लागतील. तोपर्यंत या भागात वाहतूक अन्य मार्गांनी वळण घेऊन वळविली जाणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

इगतपुरी ते आमने टप्पा लवकरच पूर्ण होणार

समृद्धीचा नागपूर ते शिर्डी हा ५२० कि.मी.चा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला केला होता. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.

तर गेल्या वर्षी तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ कि.मी.चा मार्ग सुरू केला होता. आता शेवटच्या टप्प्यात ७६ कि.मी.चा इगतपुरी ते आमने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूरhighwayमहामार्गMumbaiमुंबई