शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

दुचाकीवरील प्रवास ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 07:01 IST

५१४३ जणांचा मृत्यू : ३५,७१७ अपघातांपैकी साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे

मुंबई : राज्यात दुचाकींची संख्या जास्त असून दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. २०१८ मध्ये घडलेल्या एकूण ३५,७१७ अपघातांपैकी दुचाकीचे सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात गेल्या वर्षी एकूण ३५,७१७ अपघात झाले, त्यामध्ये १३,२६१ जणांना जीवास मुकावे लागले. २०,३३५ जण गंभीर, तर ११,०३० किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे झाले, तर सर्वात कमी ई-रिक्षाचे दोनच अपघात घडले असून, यात एकाचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या २०१८च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या वर्षी दुचाकीचे एकूण १३,७३२ अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला असून, ७,२७८ जण गंभीर जखमी, तर ३,८२५ जण किरकोळ जखमी झाले. घडलेल्या एकूण अपघातांमध्ये दुचाकीनंतर कार, जीप, व्हॅन, टॅक्सी या चारचाकी वाहनांचा नंबर लागतो. या वाहनांचे एकूण ७,५९१ अपघात घडले. यात २,४५० जणांना जीवास मुकावे लागले. ४,९०२ गंभीर जखमी झाले, तर २,४६८ जणांना किरकोळ दुखापत झाली. तर याच कालावधीत ट्रक, लॉरीचे ३,९२५ अपघात होऊन १,७१९ जणांचा मृत्यू झाला. बसचे १,६८९ अपघात होऊन ६२३ जणांचा मृत्यू झाला. अवजड वाहने, ट्रॉलीचे १,३७८ अपघात घडले. यात ६३६ जणांचा मृत्यू झाला असून, ६६२ गंभीर जखमी आणि ३२० किरकोळ जखमी झाले.ई-रिक्षा सुरक्षितमहामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ई-रिक्षाचे केवळ दोनच अपघात घडले असून यात एकाचा मृत्यू झाला. तर, सायकलचे ४१३ अपघात होऊन यात १२५ ठार, २२६ गंभीर, तसेच १४२ किरकोळ जखमी झाले. इतर १,९६५ अपघातांमध्ये ९१४ जणांना जीव गमवावा लागला असून, यात ९८६ गंभीर, तर ४५८ किरकोळ जखमी झाले.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलर