शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

दुचाकीवरील प्रवास ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 07:01 IST

५१४३ जणांचा मृत्यू : ३५,७१७ अपघातांपैकी साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे

मुंबई : राज्यात दुचाकींची संख्या जास्त असून दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. २०१८ मध्ये घडलेल्या एकूण ३५,७१७ अपघातांपैकी दुचाकीचे सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात गेल्या वर्षी एकूण ३५,७१७ अपघात झाले, त्यामध्ये १३,२६१ जणांना जीवास मुकावे लागले. २०,३३५ जण गंभीर, तर ११,०३० किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे झाले, तर सर्वात कमी ई-रिक्षाचे दोनच अपघात घडले असून, यात एकाचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या २०१८च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या वर्षी दुचाकीचे एकूण १३,७३२ अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला असून, ७,२७८ जण गंभीर जखमी, तर ३,८२५ जण किरकोळ जखमी झाले. घडलेल्या एकूण अपघातांमध्ये दुचाकीनंतर कार, जीप, व्हॅन, टॅक्सी या चारचाकी वाहनांचा नंबर लागतो. या वाहनांचे एकूण ७,५९१ अपघात घडले. यात २,४५० जणांना जीवास मुकावे लागले. ४,९०२ गंभीर जखमी झाले, तर २,४६८ जणांना किरकोळ दुखापत झाली. तर याच कालावधीत ट्रक, लॉरीचे ३,९२५ अपघात होऊन १,७१९ जणांचा मृत्यू झाला. बसचे १,६८९ अपघात होऊन ६२३ जणांचा मृत्यू झाला. अवजड वाहने, ट्रॉलीचे १,३७८ अपघात घडले. यात ६३६ जणांचा मृत्यू झाला असून, ६६२ गंभीर जखमी आणि ३२० किरकोळ जखमी झाले.ई-रिक्षा सुरक्षितमहामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ई-रिक्षाचे केवळ दोनच अपघात घडले असून यात एकाचा मृत्यू झाला. तर, सायकलचे ४१३ अपघात होऊन यात १२५ ठार, २२६ गंभीर, तसेच १४२ किरकोळ जखमी झाले. इतर १,९६५ अपघातांमध्ये ९१४ जणांना जीव गमवावा लागला असून, यात ९८६ गंभीर, तर ४५८ किरकोळ जखमी झाले.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलर