शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

दुचाकीवरील प्रवास ठरतोय जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 07:01 IST

५१४३ जणांचा मृत्यू : ३५,७१७ अपघातांपैकी साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे

मुंबई : राज्यात दुचाकींची संख्या जास्त असून दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. २०१८ मध्ये घडलेल्या एकूण ३५,७१७ अपघातांपैकी दुचाकीचे सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात गेल्या वर्षी एकूण ३५,७१७ अपघात झाले, त्यामध्ये १३,२६१ जणांना जीवास मुकावे लागले. २०,३३५ जण गंभीर, तर ११,०३० किरकोळ जखमी झाले. सर्वाधिक साडेतेरा हजार अपघात दुचाकींचे झाले, तर सर्वात कमी ई-रिक्षाचे दोनच अपघात घडले असून, यात एकाचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या २०१८च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गेल्या वर्षी दुचाकीचे एकूण १३,७३२ अपघात घडले. यात ५,१४३ जणांचा मृत्यू झाला असून, ७,२७८ जण गंभीर जखमी, तर ३,८२५ जण किरकोळ जखमी झाले. घडलेल्या एकूण अपघातांमध्ये दुचाकीनंतर कार, जीप, व्हॅन, टॅक्सी या चारचाकी वाहनांचा नंबर लागतो. या वाहनांचे एकूण ७,५९१ अपघात घडले. यात २,४५० जणांना जीवास मुकावे लागले. ४,९०२ गंभीर जखमी झाले, तर २,४६८ जणांना किरकोळ दुखापत झाली. तर याच कालावधीत ट्रक, लॉरीचे ३,९२५ अपघात होऊन १,७१९ जणांचा मृत्यू झाला. बसचे १,६८९ अपघात होऊन ६२३ जणांचा मृत्यू झाला. अवजड वाहने, ट्रॉलीचे १,३७८ अपघात घडले. यात ६३६ जणांचा मृत्यू झाला असून, ६६२ गंभीर जखमी आणि ३२० किरकोळ जखमी झाले.ई-रिक्षा सुरक्षितमहामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये ई-रिक्षाचे केवळ दोनच अपघात घडले असून यात एकाचा मृत्यू झाला. तर, सायकलचे ४१३ अपघात होऊन यात १२५ ठार, २२६ गंभीर, तसेच १४२ किरकोळ जखमी झाले. इतर १,९६५ अपघातांमध्ये ९१४ जणांना जीव गमवावा लागला असून, यात ९८६ गंभीर, तर ४५८ किरकोळ जखमी झाले.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलर