शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

साई चौकातील वीजवाहिन्यांचे स्थलांतर

By admin | Updated: June 10, 2016 01:50 IST

बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा

पिंपरी : बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची बुधवारी दिल्ली येथे भेट घेतली. या संदर्भात महिनाअखेरपर्यंत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून, औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर पिंपळे निलख, साई चौक येथील उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या सहा उच्चदाब वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतर करण्यासही संरक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली.संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली, त्या वेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सरचिटणीस प्रमोद निसळ उपस्थित होते. बोपखेल ग्रामस्थांच्या दळवळणासाठी मुळा नदीवर तात्पुरता तरंगता पूल उभारला होता. मात्र, तो लष्कराने सोमवारी हा पूल काढून टाकला. त्यामुळे बोपखेलमधील नागरिकांना १८ ते २० किलोमीटर वळसा घालून पिंपरी-चिंचवडशी संपर्क करावा लागत आहे. नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी महापालिका व लष्कराने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे आमदार जगताप यांनी संरक्षणमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. कुंभमेळ्याच्या वेळी गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या धर्तीवर बोपखेलच्या नागरिकांसाठी मुळा नदीवर पाँटून पूल तातडीने उभारण्याची मागणी केली. हा पूल उभारला जात नाही, तोपर्यंत सीएमईच्या हद्दीतून जाणारा जुना रस्ता बोपखेल ग्रामस्थांसाठी खुला करावा, अशी मागणीही केली. (प्रतिनिधी)>पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतून जाणारा रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता बंद केल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणीही केली. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी बोपखेलवासीयांसाठी पर्यायी रस्ता आणि रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्त्याबाबत या महिनाअखेरपर्यंत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.४औंध-रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळे निलख, साई चौक येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सहा उच्चदाब वीजवाहिन्या अडथळा ठरत आहेत. वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतरित केल्यास उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. वीजवाहिन्यांच्या स्थलांतरास मान्यता देण्याची मागणी त्यांनी तातडीने मान्य करून वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली.