शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

टोलवाला रस्ता बांधकाम खात्याने पळवला!

By admin | Updated: May 14, 2015 01:33 IST

ज्या कामांसाठी एमएसआरडीसीची स्थापना करण्यात आली ती पीडब्लूडीने केली, एमएसआरडीसीने त्यांना दिलेली कामे नीट केली नाहीत आणि टोल संस्कृती

अतुल कुलकर्णी, मुंबईज्या कामांसाठी एमएसआरडीसीची स्थापना करण्यात आली ती पीडब्लूडीने केली, एमएसआरडीसीने त्यांना दिलेली कामे नीट केली नाहीत आणि टोल संस्कृती आल्यानंतर आहे ते रस्तेही पीडब्ल्यूडीने पळवले. परिणामी एमएसआरडीसीचा पांढरा हत्ती कोणासाठी पोसला गेला, असा प्रश्न पडावा. शासनाने एमएसआरडीसीच्या स्थापनेच्या जीआरमध्ये आणि त्यानंतरच्या दुरुस्तीमध्ये (२९ नोव्हेंबर १९९६) भूमिका स्पष्ट केली होती. पीडब्लूडीला व्यापारी तत्वावर काम करता येत नाही, आणि पैसे उभे करुन काम करणे हे त्यांच्या मॅन्यूअलमध्ये नाही म्हणून पैसे उभे करण्यासाठी एमएसआरडीसीची स्थापना झाली. राज्याला व देशाला रोजगार हमी योजना देणारे वि.स. पागे यांचे चिरंजीव प्रकाश पागे यांना गडकरींनी यासाठी बोलावले. या दोघांनी मिळून बीओटी या संकल्पनेला जन्माला घातले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसी या दोन्हीसाठी एकच मंत्रीपद होते. विभागणी नंतर झाली. ५० कोटीच्या वरची कामे एमएसआरडीसीने करावीत असे गृहीत धरले होते तर ५० कोटीच्या आतली कामे देखील शासनाची मान्यता घेऊन एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत करावीत (२२ आॅक्टोबर १९९६) असे मान्य केले होते. पण पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी ओरडा केल्याने, पुन्हा ४ एप्रिल १९९८ रोजी नवीन आदेश जारी केला ज्यात एमएसआरडीसीकडे कोणती कामे सोपवावीत हे स्पष्ट केले गेले. त्यातही ज्या ठिकाणी टोल लावला जाणार आहे ती सगळी कामे एमएसआरडीसीने करावीत असे ठरले प्रत्यक्षात पीडब्लूडीने टोलनाके उभे केले आणि ज्यांनी टोलची अंमलबजावणी करायची त्यांचे दिवाळे निघाले.