शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात ‘आॅगस्ट क्रांती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 06:00 IST

मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे.

औरंगाबाद/ मुंबई : मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात दोन वर्षांपूर्वी ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनी झाली होती. मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे शांततेत काढले.सरकारने आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. उच्च न्यायालयाने आंदोलन न करण्याचे आवाहन केल्यामुळे या बंदबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर, औरंगाबादेत बुधवारी समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक झाली. ३२ जिल्ह्यांतील समन्वयक उपस्थित होते. चर्चेअंती नियोजित ‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय कायम ठेवण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी पोलीस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंद काळात कुठलाही अनुचिता प्रकार घडू नये, याकरिता अधिक दक्षता घ्यावी, असे त्यांनी या वेळी सांगितले.>शिक्षकाची आत्महत्याआरक्षणाअभावी मुलांना नोकरी मिळत नाही नसल्याने लातूर जिल्ह्यातील रमेश पाटील या शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली.>अहिंसक मार्गाने बंदअहिंसेच्या मार्गाने बंद पुकारण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधा, प्रवासी वाहतूक, अ‍ॅम्बुलन्स, शाळेची बस, अशा अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येणार नाहीत. नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन मराठा क्रांती मोर्चाकडून होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले, तसेच नागरिकांनी मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करण्याचे आवाहनही समन्वयकांनी केले आहे.>धार्मिक कार्यक्रमांना रोखू नकाबंददरम्यान धार्मिक कार्यक्रमांना जाणाºयांना रोखू नये. मुस्लीम बांधव हज यात्रेला जात आहेत. त्यांचा रस्ता अडवू नये, एसटी महामंडळाच्या गाड्या अडवू नयेत, तोडफोड, जाळपोळ करू नये, असे आवाहनही करण्यात आले.>१५ आॅगस्टला चूलबंदमराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. १० आॅगस्टनंतर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलनात जाळपोळ, हिंसा करतो असा आरोप राज्यकर्त्यांनी लावला असल्यामुळे स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला स्वत:लाच आत्मक्लेश करून घेण्यासाठी चूलबंद आंदोलन केले जाणार असल्याचेही समन्वयकांनी स्पष्ट केले.औरंगाबाद, पुणे आणि अमरावती जिल्ह्यातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.>या आहेत मागण्या । मराठा आरक्षण द्या । १० आॅगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या । जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करा । आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण