शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात ‘आॅगस्ट क्रांती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 06:00 IST

मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे.

औरंगाबाद/ मुंबई : मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात दोन वर्षांपूर्वी ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनी झाली होती. मराठा समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे शांततेत काढले.सरकारने आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. उच्च न्यायालयाने आंदोलन न करण्याचे आवाहन केल्यामुळे या बंदबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर, औरंगाबादेत बुधवारी समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक झाली. ३२ जिल्ह्यांतील समन्वयक उपस्थित होते. चर्चेअंती नियोजित ‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय कायम ठेवण्यात आला. या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी पोलीस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंद काळात कुठलाही अनुचिता प्रकार घडू नये, याकरिता अधिक दक्षता घ्यावी, असे त्यांनी या वेळी सांगितले.>शिक्षकाची आत्महत्याआरक्षणाअभावी मुलांना नोकरी मिळत नाही नसल्याने लातूर जिल्ह्यातील रमेश पाटील या शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केली.>अहिंसक मार्गाने बंदअहिंसेच्या मार्गाने बंद पुकारण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधा, प्रवासी वाहतूक, अ‍ॅम्बुलन्स, शाळेची बस, अशा अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येणार नाहीत. नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन मराठा क्रांती मोर्चाकडून होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले, तसेच नागरिकांनी मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करण्याचे आवाहनही समन्वयकांनी केले आहे.>धार्मिक कार्यक्रमांना रोखू नकाबंददरम्यान धार्मिक कार्यक्रमांना जाणाºयांना रोखू नये. मुस्लीम बांधव हज यात्रेला जात आहेत. त्यांचा रस्ता अडवू नये, एसटी महामंडळाच्या गाड्या अडवू नयेत, तोडफोड, जाळपोळ करू नये, असे आवाहनही करण्यात आले.>१५ आॅगस्टला चूलबंदमराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. १० आॅगस्टनंतर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलनात जाळपोळ, हिंसा करतो असा आरोप राज्यकर्त्यांनी लावला असल्यामुळे स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला स्वत:लाच आत्मक्लेश करून घेण्यासाठी चूलबंद आंदोलन केले जाणार असल्याचेही समन्वयकांनी स्पष्ट केले.औरंगाबाद, पुणे आणि अमरावती जिल्ह्यातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.>या आहेत मागण्या । मराठा आरक्षण द्या । १० आॅगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या । जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करा । आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण