शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुप्पट - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 04:12 IST

४,७३८ रिक्त पदे भरणार; ‘एमफुक्टो’चे कामबंद आंदोलन मागे

मुंबई : विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमधील अनेक वर्षे रिक्त राहिलेल्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून अध्यापकांच्या ३ हजार ५८०, शारीरिक शिक्षण संचालनालयातील १३९, ग्रंथपालांच्या १६३, व प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८५६ अशा एकूण ४ हजार ७३८ जागा येत्या काळात भरण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली. तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.एक पैसाही न देता शिक्षकांची भरती व्हावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री तावडे म्हणाले. राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त होती. विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर राज्य शासनाने बंदी घातली होती. ती उठवावी, यासाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एमफुक्टो) माध्यमातून प्राध्यापकांनी राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले होते. शिक्षणमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर १५ दिवसांनी ते मागे घेण्यात आले होते.अंमलबजावणी लवकर करावीएमफुक्टोच्या शिष्टमंडळ आणि शिक्षणमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्राध्यापक भरतीवरील बंदी लवकरच उठविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे, ४० टक्के जागा भरण्यात येत असून, तासिका तत्त्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी- ताप्ती मुखोपाध्याय, राज्यध्यक्षा, एमफुक्टो

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducationशिक्षण