शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कर्जाच्या जाचाला कंटाळला, एकमेकांना मिठी मारत शेतकऱ्याने कुटुंबासह प्यायलं विष

By ajay.patil | Updated: April 6, 2023 17:24 IST

शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू : पत्नी व मुलाची प्रकृतीही गंभीर ; एकमेकांना मिठी मारत, केले विषप्राषण

जळगाव - जेमतेम शिल्लक असलेली जमीन, त्यात अतीवृष्टीमुळे कमी आलेले उत्पन्न, घरात बेरोजगारीने त्रस्त झालेला मुलगा , त्यातच कुंटूंबाचा गाडा हाकलण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होवू न शकल्याने गुरुवारी सकाळी ७.३० वाजता जळगाव तालुक्यातील वडली येथील एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसोबत विषप्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर पत्नी व मुलाची प्रकृती देखील गंभीर आहे.

तालुक्यातील वडली येथील शेतकरी नारायण दंगल पाटील (वय ६६) हे पत्नी भारती नारायण पाटील (वय ६०) व मुलगा गणेश नारायण पाटील (वय २४) यांच्या समवेत वास्तव्याला आहेत. नारायण पाटील यांची गावात जेमतेम शेती आहे. तर पारोळा तालुक्यातील बावटे येथे थोडी जमीन आहे.  त्यातुन आलेल्या थोड्या उत्पन्नातून नारायण दंगल पाटील हे आपल्या कुंटूंबाचा उदरनिर्वाह करत होते.  मोठा मुलगा गणेश हा गावातच राहत असून, तो बेरोजगार आहे. तर लहान मुलगा मयुर हा नाशिक येथे खासगी रुग्णालयात कामाला आहे. दोन्ही मुलं अविवाहीत आहेत. अशा परिस्थितीत कुंटूंबाचा गाडा हाकलण्यासाठी नारायण पाटील यांनी कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड होत नसल्याने त्या कर्जाच्या जाचातून त्यांनी आत्महत्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली.

एकमेकांना मिठी मारत, केले विषप्राषणगुरुवारी सकाळी ७.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला. नारायण पाटील यांचा पुतण्या शामकांत पाटील हा गावातच वास्तव्याला असतो. त्याला सकाळी  गणेश पाटील याने फोन करून, घरी येण्याची विनंती केली. गणेश हा फोनवर रडत असल्याने शामकांत पाटील यांनी घाईतच आपले भाऊ संतोष व रमेश पाटील यांना सोबत घेवून, नारायण पाटील यांचे घर गाठले.  घरात प्रवेश केल्यानंतर समोरच शेतकरी नारायण पाटील आपल्या व मुलासोबत मिठी घेवून अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. त्यांनी विषप्राषण केल्याचे संतोषच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ तिघांना खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यात उपचारादरम्यान नारायण पाटील यांचा मृत्यू झाला. तर मुलगा गणेश व पत्नी भारती यांची  प्रकृती गंभीर आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी