शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने आणली शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ - राधाकृष्ण विखे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 19:26 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

वरवटबकाल (ता. संग्रामपूर) : अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा बुलडाणा जिल्ह्यात दाखल शनिवारी दाखल झाली. ही जनसंघर्ष यात्रा दुपारी ४.३० वाजता वरवटबकाल येथे दाखल झाली. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुकुलजी वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा.अशोक चव्हाण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,महाराष्ट सहप्रभारी आशिषजी दुआ,आ.वजाहत मिर्जा,आ.अब्दुल सत्तार,जिल्हा अध्यक्ष आमदार राहुल बोन्द्रे,आ. हर्षवर्धन सपकाळ, (अखिल भारतीय कॉग्रेस सरचिटणीस)प्रदेश सरचिटणीस अॅड, गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, मदन भरगड, संजय राठोड, विजय अंभोरे,यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते तसेच जळगाव जामोद मतदार संघातीलपदाधिकारी सह बुलढाणा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर उपस्थित होते. यापुढे पुढे बोलतांना विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. मोदी सरकारला जनशक्तीची ताकद आपल्या मतदानातून दाखवण्याची वेळ आली आहे. या सरकारने हा देश पोखरून काढला आहे. जलयुक्त शिवार फक्त नावालाच असल्यामुळे या योजनेबाबत कोटी रुपयांची उलाढाल केली. ही रक्कम शेतक-यांच्या घामाची असून शेतक-यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही सरकार पूर्ण करू शकले नाही. सरकार भगवान रामाच्या नावाचा राजकारण करीत असून  जातीय आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेता त्यावर केवळ राजकारण केल्या जात असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे संग्रामपूर तालुक्यात सोनाळा येथे दाखल होताच येथील कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतीषबाजीत स्वागत केले. दरम्यान काटेल येथे संत गुलाब बाबा यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस