शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

साईबाबांवरही आली ‘श्रद्धा व सबुरी’ची वेळ !

By admin | Updated: June 26, 2014 00:55 IST

द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांवर बेछूट मुक्ताफळे उधळल्याने उत्तरेत कट्टर हिंदू आणि मुस्लीम धर्माधिका:यांमध्ये वैचारिक धुनी पेटली आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांवर बेछूट मुक्ताफळे  उधळल्याने उत्तरेत कट्टर हिंदू आणि मुस्लीम धर्माधिका:यांमध्ये वैचारिक धुनी पेटली आहे. आखाडय़ांचे प्रस्थ असलेल्या वाराणशी, अयोध्या, हरिद्वार, लखनौ, अलाहाबाद भागात महंत हमरीतुमरीवरही आले आहेत. मुसलमानांशी साईबाबांना जोडू नका, अशी थेट भूमिका  बरेली आणि देवबंद उलेमांनी घेतली आहे. त्यामुळे एकतेचे प्रतीक मानल्या जाणा:या या फकिराला आता ‘श्रद्धा व सबुरी’ या स्वत:च्याच तत्त्वातून भक्तीचा नवमार्ग सांगावा लागणार आहे, असे दिसते. 
साईबाबा देव नाहीत, मंदिर उभारून पूजा करणोही गैर, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे मत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी व्यक्त केले. त्यानंतर एकच गहजब साईभक्तांमध्ये निर्माण झाला. शिर्डीमध्ये लागलीच पडसाद उमटले. शिर्डी, चंदीगढ  व इंदूरमध्ये प्रकरण पोलिसात गेले.  वाराणशी व बैतुलमध्ये शंकराचार्याच्या प्रतिमांचे दहन झाले. आता धर्ममरतडांमध्ये वाक्युद्ध रंगले. 
हरिद्वारच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी शंकराचार्यावर खरपूस टीका केली. स्वरूपानंद यांची बुद्धी नाठी झाली आहे. त्यांचे फक्त वय वाढले. त्यांनी असे विधान करायला नको होते, गरजही नव्हती. साईबाबा मानवतेचे दूत होते. त्यांनी मानवजातीचे भलेच केले, असे ते म्हणतात. त्याचवेळी परिषदेचे प्रवक्ते बाबा हटयोगी यांनी शंकराचार्याची बाजू घेतली. जे शंकराचार्याच्या विरोधात बोलतात ते ‘पाखंडी’ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 
विश्व सनातन धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्रनाथ अवधूत यांनी साईबाबा महान संत होऊ शकतील, पण देव नाही. शंकराचार्य खरे बोलत आहेत, असे सांगितले.
 
आता वाद करणो अयोग्य
च्बरेलीच्या नबिरे आला हजरत मौलाना मनांन रजा खान उर्फ मननी मिया यांनी म्हटले की, साईबाबांची पूजा खूप वषार्पासून होते, आता अचानक या विषयावर विवाद करणो अयोग्य आहे. त्यांनी चर्चेत यावे म्हणून हा विषय छेडला.
च्ऑल इंडिया जमात रजा - ए - मुस्तफाचे सरचिटणीस म्हणाले की, साईबाबांमध्ये मुसलमानांना काहीही स्वारस्य नाही, ते हिंदूंचे नेता होते. ऑल इंडिया सुफी कौन्सिलचे अध्यक्ष सुफी रईस मियां कादरी म्हणतात की, साईबाबा फकीर होते. कोणताच  मनुष्य ईश्वर असू शकत नाही. त्यावरून निर्माण झालेला विवाद दोन धर्मामध्ये अकारण कटुता निर्माण करण्याचा प्रय} होत आह़े