शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

वाघ, बिबटे आणि लोकांचा संघर्ष वाढतच जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 05:50 IST

मानवी वस्त्या विस्तारल्या, विकास प्राण्यांच्या जीवावर

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : गेल्या सहा वर्षांत राज्यात ९३ वाघ आणि तब्बल ४४३ बिबट्यांचे मृत्यू झाले. त्यातील ५६ वाघ आणि २५१ बिबट्यांना नैसर्गिक मृत्यू आला. पण ३७ वाघ आणि १९२ बिबटे मात्र अपघातात किंवा शिकारीत मरण पावले. मानवी वस्त्या विस्तारल्या, विकासाचे मॉडेल प्राण्यांच्या जीवावर बेतू लागले, तसे ते माणसांचाही बळी घेत आहे. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अटळ आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे पाच बिछडे होरपळून मेले, तर शनिवारी पाडव्याच्या दिवशी चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी जवळ वाघाने दोन माणसांचा जीव घेतला. यावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, वाघ किंवा बिबट्या यांचे नैसर्गिक भक्ष्य दोन पायांचा प्राणी माणूस हा कधीच नाही. माणसांना टाळणे हा वाघांचा मूळ गुणधर्म आहे.

पण मानवी वस्त्या विस्तारल्या, त्यातून कचरा वाढला, कचऱ्याच्या जागी डुकरं, कुत्री आणि कोंबड्या आल्या. बिबट्यांना सहज टप्प्यात हे खाद्य मिळू लागले त्यामुळे ते मानवी वस्तीत येऊ लागले. त्यातून माणूस आणि बिबट्यांचा संघर्ष वाढत चालला आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्र हे ३,०७,७१३ चौरस किलोमीटर आहे, त्यापैकी ६१,५७९ चौ. कि.मी. वनक्षेत्र आहे, तर ५०,६८२ चौ. कि.मी. जागेवर वृक्षाच्छादन आहे. तसेच ९५०० चौ. किलोमिटर एवढे अभयारण्य आणि राष्टÑीय उद्यान आहे. जंगलाची साखळी टिकल्यामुळे वाघांची, बिबट्यांची संख्या वाढली. पण जैविक दबावातून, आवळा, तेंदूपत्ता, मोहाची फुलं, करवंद, सरपण अशा असंख्य गोष्टीसाठी आजही लोक जंगलावर अवलंबून आहेत. तेंदूपत्ता किंवा मोहाची फुले काढण्यासाठी खाली वाकून काम करावे लागते. त्यामुळे वाघ किंवा बिबट्याला ती आपली शिकार वाटते. त्यातच आपल्याकडे जंगलाचे लहान मोठे एक हजाराच्या आसपास तुकडे आहेत. एकट्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या चारही बाजूने पूर्वी नव्हती एवढी घरे उभी राहिली आहेत. वाघांचा अधिवास आधीपासून तेथेच होता, पण माणूस तेथे वस्तीला आला. वाघाला त्याच्या सीमेची माहिती कशी असणार? त्यातून संघर्षाच्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.

वन विभाग यावर काय करत आहे असे विचारले असता नितीन काकोडकर म्हणाले की, गेल्या १० ते १५ वर्र्षात आमचा प्रतिसाद वाढला, आमच्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध झाले आहे. मात्र प्राण्यांना पकडण्यापेक्षा तेथे जमलेल्या बघ्यांना नियंत्रणात आणणे अधिकाऱ्यांसाठी जास्त त्रासदायक असते. कुतूहल लोकांना गप्प बसू देत नाही.ते आम्हाला त्रासदायक ठरते.वर्ष      वाघ   बिबटे२०१३   १५   ४३२०१४   ६    ६५२०१५   १३   ६६२०१६  १४   ९१२०१७  २२  ८५२०१८  १९  ८८२०१९    ४      ५(एकूण) ९३   ४४३ऊ साची शेती बिबट्यांना पोषकऊ साच्या शेतीसारखी पोषक व सुरक्षीत जागा बिबट्यांना दुसरी नाही. कारण एकदा पाणी सोडले की रोज ऊ साच्या शेतीकडे बघायची गरज नसते. शेतात व आजूबाजूला डुकरे, कोंबड्या, कुत्री असतात. त्यामुळे खाद्य, पाणी आणि संरक्षण गोष्टी त्यांना तेथे मिळू लागल्या. त्यामुळे ऊ साच्या शेतात बिबट्यांचे प्रजनन वाढले आहे. त्यातूनच पुण्याची दुर्देवी घटना घडली.लोकांनी आग न लावता वनअधिकाऱ्यांना कळवले असते तर ते बछडे वाचले असते, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले. 

टॅग्स :leopardबिबट्या