शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राष्ट्रवादीचे तीन आमदार शिवसेनेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 5:18 AM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे.

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत.बार्शी विधानसभा शिवसेनेने मागितली आहे. भाजपही त्यासाठी फार आग्रही नाही. २०१४ साली तेथून आयत्यावेळी भाजपच्या तिकीटावर राजेंद्र मिरगणे उभे होते. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळावर सहअध्यक्ष केले असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. राजा राऊत हे शिवसेनेत होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र सोपल सेनेत गेले तर राऊत अपक्ष म्हणून उभे राहू शकतात.

सोपल यांनी त्यांचा आर्यन साखर कारखाना विकला, पण शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. त्यातून तक्रारी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सोपल यांना शिवबंधन बांधायचे आहे. सोपल राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले.विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून निवडून आले आहेत. त्यांना २०१४ साली टक्कर देणारे कमलाकर वळवी हे आता शिवसेनेत आहेत. त्यावेळी त्यांना दोन नंबरची मते मिळाली होती. शिवाय तेव्हा भाजपमध्ये असणारे जगदीश धुडी हे आता शिवसेनेत असून ते ही इच्छुक आहेत. या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोपा आहे. म्हणून तरे शिवबंधन बांधण्यास तयार झाले आहेत. दहीहंडीच्या दिवशी ते शिवसेनेच्या कार्यक्रमातही जाऊन आले.

नगर शहराचे राष्टÑवादीचे आ. संग्राम जगताप यांचा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे जगताप यांना शिवसेनेत जायचे आहे. मात्र आपण नुकताच खा. सुप्रिया सुळे यांचा कार्यक्रम घेतला, आपले अद्याप काही ठरलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. श्रीगोंदाचे राष्टÑवादीचे आ. राहुल जगताप पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. ती जागा भाजपकडे आहे. शिवाय राधाकृष्ण विखे भाजपमध्ये आल्यामुळे भाजपला ती जागा सोपी झाली आहे. तेथून भाजपच्या तिकीटावर बबनराव पाचपुते इच्छुक आहेत पण भाजप त्यासाठी फारशी उत्सुक नाही. ती जागा भाजपच लढवणार आहे. मात्र उमेदवार कोण हे निश्चित नाही. त्यामुळे राहुल जगताप भाजपमध्ये जातील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. मात्र शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आ. वैभव पिचड आधीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर उर्वरित दोन आमदार पक्षांतराच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी नगर जिल्ह्यात शुन्यावर येईल. शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेडमधून इच्छूक आहेत.

या बदलानंतर जिल्ह्यात त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची पाटी कोरी असणार आहे. राधाकृष्ण विखे आधीच भाजपमध्ये गेल्यामुळे राजकीय दृष्टीने तुल्यबळ असणाºया अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसकडे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (संगमनेर) आणि श्रीरामपूरचे भाऊसाहेब कांबळे हे दोनच आमदार उरले आहेत. थोरात यांना काँग्रेस, राष्टÑवादी आघाडी मजबूत करण्याचे काम जिल्ह्यातूनच सुरु करावे लागले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना