शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:19 IST

Kunal Patil News: काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे. आम्हाला आमच्या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.

Kunal Patil News: उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, याच उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे.  अगदी इंदिरा गांधी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करायच्या. मात्र आता या भागाकडे पक्षाचे लक्ष राहिलेले नाही. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही याच भागातून निवडणूक लढवलेली आहे आणि जिंकलो आहे. काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे, असे सांगत काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटीलभाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता खुद्द कुणाल पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

माझा जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. त्यामुळेच भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या १० भाजपाने देशात ज्या पद्धतीने विकास केला आहे, राज्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचे वातावरण निर्माण केले आहे. प्रलंबित प्रश्नांना सोडवण्याचे काम सुरू आहे. आमच्या भागातील प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा पुढाकार आहे. हे सर्व वातावरण पाहता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक सर्वसामान्य जनतेत भावना निर्माण झाली की, विकासाच्या प्रवाहात आपल्याला राहिले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र आणि आपल्या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढला पाहिजे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.

आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना विविध पक्षातून त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षात भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक आमच्याकडे येत असतील, तर आम्ही त्यांचे निश्चित स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पत्रकारांशी बोलत असताना कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

दरम्यान, कुणाल पाटील यांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये. त्यांचे आजोबा काँग्रेसकडून खासदार होते, त्यांचे वडील दीर्घकाळ मंत्रिमंडळात होते. हे टाकलेले जे कुंपण होते, ते काँग्रेसच्या विचारांकरिता होते. मात्र हे कुंपणच शेत खाताना दिसत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजपा स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही. भाजपा ही चेटकीण आहे, ही चेटकीण काँग्रेसच्या नेत्यांना खात आहे. त्यातील हे उदाहरण आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKunal Patilकुणाल पाटील