शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:19 IST

Kunal Patil News: काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे. आम्हाला आमच्या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.

Kunal Patil News: उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, याच उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे.  अगदी इंदिरा गांधी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करायच्या. मात्र आता या भागाकडे पक्षाचे लक्ष राहिलेले नाही. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही याच भागातून निवडणूक लढवलेली आहे आणि जिंकलो आहे. काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे, असे सांगत काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटीलभाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता खुद्द कुणाल पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

माझा जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. त्यामुळेच भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या १० भाजपाने देशात ज्या पद्धतीने विकास केला आहे, राज्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचे वातावरण निर्माण केले आहे. प्रलंबित प्रश्नांना सोडवण्याचे काम सुरू आहे. आमच्या भागातील प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा पुढाकार आहे. हे सर्व वातावरण पाहता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक सर्वसामान्य जनतेत भावना निर्माण झाली की, विकासाच्या प्रवाहात आपल्याला राहिले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र आणि आपल्या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढला पाहिजे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.

आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना विविध पक्षातून त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षात भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक आमच्याकडे येत असतील, तर आम्ही त्यांचे निश्चित स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पत्रकारांशी बोलत असताना कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

दरम्यान, कुणाल पाटील यांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये. त्यांचे आजोबा काँग्रेसकडून खासदार होते, त्यांचे वडील दीर्घकाळ मंत्रिमंडळात होते. हे टाकलेले जे कुंपण होते, ते काँग्रेसच्या विचारांकरिता होते. मात्र हे कुंपणच शेत खाताना दिसत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजपा स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही. भाजपा ही चेटकीण आहे, ही चेटकीण काँग्रेसच्या नेत्यांना खात आहे. त्यातील हे उदाहरण आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKunal Patilकुणाल पाटील