शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

मेटेंशी जवळीक पवारांना महागात; गेवराईत बदामरावांचे पारडे जड ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 12:21 PM

गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणूक पार पडताच महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानुसार विद्यमान आणि माजी आमदारांसह इच्छूकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मागील पाच वर्षांत झालेल्या पक्षांतरामुळे अनेक मतदार संघातील उमेदवारीवरून युतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड मतदार संघासह गेवराई मतदार संघाच्या उमेदवारीवरून पक्ष नेतृत्वासमोर अडचणी निर्माण होणार आहे.

गेवराई मतदार संघातील पंडितांचे आपापसातील वैर सर्वश्रूत आहे. एकेकाळी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि आता शिवसैनिक झालेले बदामराव पंडीत यांच्यातून विस्तवही जात नसे. अशा स्थितीत गेवराईतून बदामराव पंडित यांनी २०१४ मध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. दोन पंडितांच्या वादात गेवराईतून लक्ष्मण पवार यांनी बाजी मारली होती.

दरम्यान २०१९ येईपर्यंत गेवराईत मोठे राजकीय बदल झाले. बदामराव पंडित शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात त्यांनी युती होणार नाही, असं गृहित धरले असावे. मात्र भाजप आणि शिवसेनेत युती होणार हे स्पष्ट आहे. तर पवार यांनी देखील विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गेवराईची जागा युतीत कोणाला मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही जागा भाजपलाच ठेवल्यास, बदामराव पंडितांच काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

दुसरीकडे आमदार पवार आणि पंकजा मुंडे यांच्यात तितकेसे सौख्य राहिले नाही. गेवराई पंचायत समिती सभापतीच्या निवडीवेळी पवार आणि मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यातच आमदार लक्ष्मण पवार यांची गेल्या काही दिवसात विनायक मेटे यांच्याशी वाढलेली जवळीक जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाला रुचणारी नाही. गेवराईतील भाजपच्या कार्यक्रमाच्या वेळी पंकजा यांनी याचा सूचक इशाराही दिला होता.

गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

दरम्यान बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांची मदत केली होती. त्याचा त्यांना मोबदला मिळण्याची आशा आहे. तर लक्ष्मण पवार यांना डावलून ही जागा शिवसेनेला सोडणे भाजप नेतृत्वाला मान्य होणार नाही. अशा या पेचात ही जागा कुणाच्या पदरी पडणार यावरून गेवराईत चर्चा रंगत आहे.