शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्पात हजारो विस्थापित

By admin | Updated: April 15, 2017 01:37 IST

मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत.

मुंबई : मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनशे कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पबाधितांचे जीवन रूळावर आणण्यात येणार आहे.गारगाई प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात वाडा येथील वैतरणा नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. तर जवाहर येथील पिंजाळ नदीवर पिंजाळ धरण उभे राहणार आहे. मात्र या प्रकल्पाची वाट मोकळी करण्यासाठी महापालिकेला आधी येथील विस्थापितांचे पुनर्वसन प्राधान्याने करावे लागणार आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आराखडा ठेवला आहे. त्यानुसार गारगाई धरण प्रकल्पामुळे सहा गावांतील १९१ कुटुंब तर पिंजाळ प्रकल्पात ११ गावांतील ८६५ कुटुंब विस्थापित होणार आहेत. गारगाई प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५६ कोटी तर पिंजाळ प्रकल्पात पाण्याखाली जाणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासाठी २४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

- मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. तर पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ३०० दशलक्ष लीटर्स आहे.- गारगाई प्रकल्पातून अतिरिक्त ४४० दशलक्ष लीटर्स प्रती दिन आणि पिंजाळ प्रकल्पातून ८६५ दशलक्ष लीटर्सने दररोजचा जलसाठा वाढणार आहे.- गारगाई प्रकल्पात विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५४ कोटी आणि पिंजाळ प्रकल्पात २४६ कोटी बेघर होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाठी खर्च केले जाणार आहेत.- या गावांबरोबरच ७५० हेक्टर्स तानसा वन जीवनही विस्थापित होणार आहे.- वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येथे आहे.- या प्रकल्पाच्या सल्ल्यासाठी ४ कोटी ६४ लाख रुपये महापालिका मोजणार आहे.