शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"सावरकर गौरव यात्रा नाव असलं तरी, ही अदानी बचाव यात्रा; यांनी ही यात्रा काढणं, सावरकरांची सर्वात मोठी बदनामी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 10:34 IST

ज्यांच्या हृदयात वीर सावरकर आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे सावरकरांना मानवंदा द्यायला हवी होती. पण ते विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात आणि याच गुलामीविरुद्ध सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंदमानात घालवलं. हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवे.

राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने राहुल गांधी यांच्या स्वातंत्रवीर सावरकरांवरील वक्तव्यानंतर, राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. यानंतर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सावरकर गौरव यात्रा नाव असले तरी ती अदानी बचाव यात्रा आहे. यांनी सावरकरांची यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, काल मुख्यमंत्री वीर सावरकर गौरव यात्रेसंदर्भात घोषणा करताना, सावरकरांसंदर्भात दोन वाक्यही उत्स्फुर्तपणे बोलू शकले नाहीत. त्यांच्यासमोर एक कागद होता तो वाचून दाखवत होते. ज्यांच्या हृदयात वीर सावरकर आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे सावरकरांना मानवंदा द्यायला हवी होती. पण ते विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात आणि याच गुलामीविरुद्ध सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंदमानात घालवलं. हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला हवे.

सावरकर गौरव यात्रा नाव असले तरी ती अदानी बचाव यात्रा -सावरकर गौरव यात्रा नाव असले तरी ती अदानी बचाव यात्रा आहे. अदानी प्रकरणावरील, त्यांच्या लुटमारीवरील लक्ष विचलित व्हावे, म्हणून सावरकरांच्या मुखवट्याखाली हे अदानी गौरव यात्रा काढत आहेत. वीर सावरकर हे एक महान देशभक्त होते, एक महान क्रांतीकारक होते, एक महान समाजसुधारक होते. शिवसेनेला आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या विषयी कायम आदर आहे. त्यामुळे या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगाचे प्रयत्न करू नये. आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय, असेही राऊत म्हणाले. 

यांनी सावरकरांची यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी -छत्रपती शिवाजी पार्कच्या बाजूला सावरकरांचे जे भव्य स्मारक आहे. त्याच्या उभारणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांचे मोठे योगदान आहे. जाऊन पाहा. सावरकरांचे हिंदूत्व आम्ही स्वीकारले आहे. ते सावरकरांप्रमाणे शेंडी जाणव्याचे हिंदूत्व नसून विज्ञानवादी हिंदूत्व आहे. हे भाजपला मान्य आहे का? सावरकरांची गोमातेवरची भूमिका त्यांना मान्य आहे का? हे ढोंग आहे, ही अदानी बचाव यात्रा आहे. खुर्ची बचाव यात्रा आहे. नाव केवळ सावरकरांचे. यांनी सावरकरांची यात्रा काढणे ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे, असा टोलाही राउतांनी नाव न घेता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस