शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

"... हा तर भाजपाचा गोरखधंदा", संजय राऊतांचा इलेक्टोरल बॉण्ड्सवरून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:36 IST

Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत.

Sanjay Raut : (Marathi News) मुंबई : इलेक्टोरल बॉण्ड्स हे निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. तसेच, भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत असून त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भाजपा आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी चिपळूण येथे झालेल्या राड्यावरून केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बॉण्ड्स निकालावर संजय राऊत म्हणाले की, गौतम अदानी आणि भाजपा वेगळे नाहीत. इलेक्टोरल बॉण्ड्सवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे आणि ज्यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स घेऊन भाजपाची तिजोरी भरली आहे. त्यांची नावे जाहीर करा, ही सूचना किंवा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात गौतम अदानींचे नाव सर्वात प्रथम आहे, मला खात्री आहे. अशा प्रकारचे आपल्या उद्योगपतींना ठेके द्यायचे आणि त्या बदल्या शेकडो कोटीचे इलेक्टोरल बॉण्ड्स निवडणूक निधी म्हणून घ्यायचे हा भाजपाचा गोरखधंदा आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये भाजपाच्या तिजोरीत आज जमा झाले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

उद्योगपती गौतम अदानी यांना वांद्रेतील एमएसआरडीची जागा मिळणार आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, मिठागराची जमीन अडाणींना, धारावी अडाणींना अख्खी मुंबई अडाणींना दिली आहे. मुंबईचे उद्या नाव बदलून अडाणीनगर केले तर १०६ हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिले आहे. त्यांना स्वर्गात पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल. काय करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हिंदुत्वरक्षक काय करताय? कोल्हापुरात बसून, अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय. हे सगळे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहे. न्यायालयाने जो काल निकाल दिलेला आहे. तो भाजपाचा मुखवटा फाडणारा आहे. त्यात जे नावे जाहीर होतील ते बघाच, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

"महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसतेय"काल चिपळूण येथे भाजपा आणि ठाकरे गटामध्ये झालेल्या राड्यावरून संजय राऊत म्हणाले की, भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. चिखलफेक करण्यासाठी भाजपाने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या, दारूच्या, अनैतिकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपाने काही भाडोत्री लोकांकडून सुरु केले आहे. आम्ही सुद्धा कठोर शब्दांचा वापर करतो. आमच्याकडून एखादा-दुसरा शब्द चुकीचाही जात असेल. मात्र ज्या पद्धतीने भाजपाने जो दारूखाना सुरु केला आहे. त्यावरून मला महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत आहे. त्याला देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपाच पूर्णपणे जबाबदार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा