शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

"हे सरकर पूर्णपणे घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले"; राऊतांनी सांगितले 4 मोठे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:24 IST

"न्यायालयाने म्हटले आहे की, व्हिपची खातरजमा करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा होता. हे चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितल्यानंतर, तुम्ही दिलासा मिळा, असे कसे म्हणता? हे बेकायदेशीर सरकार आहे."

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री ठेवता येणार नाही. त्याच बरोबर 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षच निर्णय घेतील, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानंतर, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हे सरकरा पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबहाय्य आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. ते सरकार बेकायदेशीरपणे घालवले आणि हे सरकार शंभर टक्के घटनाबाह्य आहे", असे राऊतांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी चार मुख्य मुद्यांकडेही सर्वांचे लक्ष वेधले.

राऊत म्हणाले, "हे सरकरा पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबहाय्य आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. मुळात शिंदे गटाने बजावलेला व्हिप बेकायदेशीर ठरल्यानंतर, पुढील सर्वच प्रक्रिया बेकायदेशी आहे. दोन, कोणत्याही गटाला शिवसेनेवर, म्हणजेच पक्षावर दावा करता येणार नाही. हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. क्रमांक तीन, राज्यपालांनी घेतलेली प्रत्येक भूमिका ही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. म्हणजेच, विश्वसदर्शक ठरावापासून पुढील प्रत्येक प्रक्रिया त्यांनी राजकीय हेतूनेच केली होती. क्रमांक चार, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही त्यांना पुनरप्रस्थापित करू शकलो असतो. हे न्यायालयाचे निरिक्षण आहे. याचाच अर्थ, ते सरकार बेकायदेशीरपणे घालवले आणि हे सरकार शंभर टक्के घटनाबाह्य आहे".

'त्या' 16 आमदारां संदर्भात काय म्हणाले राऊत? -"आता 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेसल तर येऊ द्या. जर व्हिपच बेकायदेशी आहे, संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर आहे, मग विधानसभा अध्यक्षांनी त्या बेकायदेशीर प्रक्रियेवर आपली भूमिका घ्याला हवी. जर घटनेनुसार देश चालणार असेल, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधानसभा अध्यक्षांनी आपण संविधानाच्या बाजूने आहोत की, घटनाबाहाय्य बेकायदेशीर लोकांच्या बाजूने आहोत? हे बघायला हवे", असेही राऊत म्हणाले.

हा निकाल देशाला, देशाच्या लोकशाहीला दिशा देणारा -"हा निकाल देशाला, देशाच्या लोकशाहीला दिशा देणारा आहे.  आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत. पण पहिले तीन निरिक्षणे अत्यंत महत्वाची आहेत. ते म्हणजे, शिंदे गटाने नेमलेलाव्हिप बेकायदेशीर ठरवणे, सुनिल प्रभू हेच कायदेशीर आणि योग्य व्हिप असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिले असेल, तर त्या व्हिपनुसार, हे आमदार बेकायदेशीर ठरलेले आहेत. तो निर्णय केवळ विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. याच बरोबर, न्यायालयाने म्हटले आहे की, व्हिपची खातरजमा करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा होता. हे चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितल्यानंतर, तुम्ही दिलासा मिळा, असे कसा म्हणता? हे बेकायदेशीर सरकार आहे," असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा जल्लोष झाला, पण निकालाअंती तोच अंगलट आलासुप्रीम कोर्टाने म्हटलं सर्व प्रक्रिया चुकली तरीही सरकार वाचलं, कारण... 

 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे