शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 07:42 IST

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रपरिषद

मुंबई : अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे, याचा मला आनंद आहे. इतिहासात एवढे बहुमत महायुतीला कधी मिळाले नव्हते. राज्यातील तमाम जनतेने मतांचा वर्षाव केला आणि ऐतिहाससिक विजय मिळाला, असे प्रतिपादन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सरकार स्थापनेचे पत्र राज्यपालांकडे सादर केल्यानंतर राजभवनवर शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे यांनी यावेळी अभिनंदनही केले.

अडीच वर्षांपूर्वी इथेच फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती, आज फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मी आणि माझ्या पक्षाने शिफारस पत्र दिले, असेही शिंदे म्हणाले.

फडणवीस माझ्याकडे आले त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे असा महायुतीच्या नेत्यांचा आग्रह आहे, त्यांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

पुढेही एकत्रित निर्णय घेऊ : फडणवीस

मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद ही तांत्रिक बाब आहे. आम्ही यापूर्वी तिघेही एकत्र निर्णय घेत आलो आहोत, पुढेही एकत्रित निर्णय घेऊ, असा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मी काल संध्याकाळी शिंदेंना विनंती केली शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात राहावे, शिवसेनेची आणि सगळ्या आमदारांचही हीच इच्छा आहे, त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे.

आम्ही एकत्रितपणे चांगले सरकार देण्याचा प्रयत्न करू, विशेषतः जी आश्वासने आम्ही जनतेला दिली आहेत ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.

‘त्यांचे माहिती नाही, मी मात्र नक्की शपथ घेणार’

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तुमचे काय असा प्रश्न पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला, त्यावर संध्याकाळपर्यंत थांबा असे उत्तर शिंदे देत असतानाच मी तर थांबणार नाही, मी उद्या शपथ घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

त्यावर अजित पवारांना सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा चांगला अनुभव असल्याचा टोला शिंदेंनी लगावला. त्यावर सकाळचा शपथविधी अर्धवट राहिला, आता पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी जोरकसपणे सांगितले.

आश्वासनांची पूर्तता करू : अजित पवार

आम्ही सर्वजण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, आम्हाला अनुभव आहे, सर्व समाजाला त्याचा फायदा कसा करून देता येईल, शेतकऱ्याला संकटातून कसे बाहेर काढता येईल, यासाठी आम्ही काम करू, तसेच निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू, असे अजित पवार यांनी सांगितले.

मी दिल्लीला अमित शाह यांची भेट घ्यायला गेलो नव्हतो, त्यामुळे त्यांनी भेट नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा