शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 07:42 IST

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रपरिषद

मुंबई : अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे, याचा मला आनंद आहे. इतिहासात एवढे बहुमत महायुतीला कधी मिळाले नव्हते. राज्यातील तमाम जनतेने मतांचा वर्षाव केला आणि ऐतिहाससिक विजय मिळाला, असे प्रतिपादन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सरकार स्थापनेचे पत्र राज्यपालांकडे सादर केल्यानंतर राजभवनवर शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे यांनी यावेळी अभिनंदनही केले.

अडीच वर्षांपूर्वी इथेच फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती, आज फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मी आणि माझ्या पक्षाने शिफारस पत्र दिले, असेही शिंदे म्हणाले.

फडणवीस माझ्याकडे आले त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे असा महायुतीच्या नेत्यांचा आग्रह आहे, त्यांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

पुढेही एकत्रित निर्णय घेऊ : फडणवीस

मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद ही तांत्रिक बाब आहे. आम्ही यापूर्वी तिघेही एकत्र निर्णय घेत आलो आहोत, पुढेही एकत्रित निर्णय घेऊ, असा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मी काल संध्याकाळी शिंदेंना विनंती केली शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात राहावे, शिवसेनेची आणि सगळ्या आमदारांचही हीच इच्छा आहे, त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे.

आम्ही एकत्रितपणे चांगले सरकार देण्याचा प्रयत्न करू, विशेषतः जी आश्वासने आम्ही जनतेला दिली आहेत ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.

‘त्यांचे माहिती नाही, मी मात्र नक्की शपथ घेणार’

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तुमचे काय असा प्रश्न पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला, त्यावर संध्याकाळपर्यंत थांबा असे उत्तर शिंदे देत असतानाच मी तर थांबणार नाही, मी उद्या शपथ घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

त्यावर अजित पवारांना सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा चांगला अनुभव असल्याचा टोला शिंदेंनी लगावला. त्यावर सकाळचा शपथविधी अर्धवट राहिला, आता पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी जोरकसपणे सांगितले.

आश्वासनांची पूर्तता करू : अजित पवार

आम्ही सर्वजण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, आम्हाला अनुभव आहे, सर्व समाजाला त्याचा फायदा कसा करून देता येईल, शेतकऱ्याला संकटातून कसे बाहेर काढता येईल, यासाठी आम्ही काम करू, तसेच निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू, असे अजित पवार यांनी सांगितले.

मी दिल्लीला अमित शाह यांची भेट घ्यायला गेलो नव्हतो, त्यामुळे त्यांनी भेट नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा