शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 07:42 IST

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रपरिषद

मुंबई : अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे, याचा मला आनंद आहे. इतिहासात एवढे बहुमत महायुतीला कधी मिळाले नव्हते. राज्यातील तमाम जनतेने मतांचा वर्षाव केला आणि ऐतिहाससिक विजय मिळाला, असे प्रतिपादन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सरकार स्थापनेचे पत्र राज्यपालांकडे सादर केल्यानंतर राजभवनवर शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे यांनी यावेळी अभिनंदनही केले.

अडीच वर्षांपूर्वी इथेच फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती, आज फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मी आणि माझ्या पक्षाने शिफारस पत्र दिले, असेही शिंदे म्हणाले.

फडणवीस माझ्याकडे आले त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे असा महायुतीच्या नेत्यांचा आग्रह आहे, त्यांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

पुढेही एकत्रित निर्णय घेऊ : फडणवीस

मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद ही तांत्रिक बाब आहे. आम्ही यापूर्वी तिघेही एकत्र निर्णय घेत आलो आहोत, पुढेही एकत्रित निर्णय घेऊ, असा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मी काल संध्याकाळी शिंदेंना विनंती केली शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात राहावे, शिवसेनेची आणि सगळ्या आमदारांचही हीच इच्छा आहे, त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे.

आम्ही एकत्रितपणे चांगले सरकार देण्याचा प्रयत्न करू, विशेषतः जी आश्वासने आम्ही जनतेला दिली आहेत ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.

‘त्यांचे माहिती नाही, मी मात्र नक्की शपथ घेणार’

अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तुमचे काय असा प्रश्न पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला, त्यावर संध्याकाळपर्यंत थांबा असे उत्तर शिंदे देत असतानाच मी तर थांबणार नाही, मी उद्या शपथ घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

त्यावर अजित पवारांना सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा चांगला अनुभव असल्याचा टोला शिंदेंनी लगावला. त्यावर सकाळचा शपथविधी अर्धवट राहिला, आता पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी जोरकसपणे सांगितले.

आश्वासनांची पूर्तता करू : अजित पवार

आम्ही सर्वजण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू, आम्हाला अनुभव आहे, सर्व समाजाला त्याचा फायदा कसा करून देता येईल, शेतकऱ्याला संकटातून कसे बाहेर काढता येईल, यासाठी आम्ही काम करू, तसेच निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू, असे अजित पवार यांनी सांगितले.

मी दिल्लीला अमित शाह यांची भेट घ्यायला गेलो नव्हतो, त्यामुळे त्यांनी भेट नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा