शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

बाप-लेकांचा पक्षांतर फंडा; आतापर्यंत ३० नेत्यांची पक्षाशी फारकत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 10:26 IST

एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यांच्या मुलांचे पक्षांतर सुरू झालं, असंच म्हणावे लागले.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षातील नेते सैरभैर झाल्याचे चित्र होते. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता, भाजप सहज सत्ता मिळवणार, अस बहुतांशी नेत्यांनी गृहितच धरले आहे. त्यातच आपल्या वारसांना राजकारणात सक्रिय केलेल्या नेत्यांना अधिकच चिंता आहे. त्यामुळे पक्षांतर करून त्यांनाही सत्तेचा प्रत्यक्ष उपभोग घेता यावा ही या पक्षांतरामागील बाजू असण्याची शक्यता आहे.

एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ३० हून अधिक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनेक नेते विद्यमान आमदार होते. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघ राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्यामुळे तत्कालीन विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून ते विजयी झाले. त्यामुळे सहाजिकच सुजय विखे सत्ताधारी पक्षात खासदार म्हणून स्थिरावले. त्यांच्या पाठोपाठ वडील राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे आता दोन्ही बाप-लेक सत्ताधारीच झाले.

राष्ट्रवादीची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी देखील मुलाच्या इच्छेखातर भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे म्हटले. वैभव पिचड यांनी लोकसभेला राष्ट्रवादीला अकोले मतदार संघातून आघाडी मिळावून दिली. परंतु, ऐनवेळी त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. एकूणच वैभव पिचड यांनाही विरोधीपक्षाचा आमदार म्हणून राहण्याची इच्छा नाही, हे स्पष्टच आहे.

पिचड यांच्या पाठोपाठ विदर्भातील राष्ट्रवादीचे एकमेव नेते आणि आमदार मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. खुद्द इंद्रनील यांनीच आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले. पुसद येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर इंद्रनील शिवसेनेत जाणार असल्याचे मनोहर नाईक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचवेळी ययाती आणि इंद्रनील या दोन्ही मुलांना सांभाळून घेण्याचे आवाहन मनोहर नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले. मोहिते पाटील कुटुंबियांचे देखील असंच झाले. आधी रणजितसिंह मोहित पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला माढा मतदार संघातून जोरदार धक्का दिला. तर मुंबईतील नाईक कुटुंबीय देखील त्यांच मार्गाने निघाले आहे.

एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यांच्या मुलांचे पक्षांतर सुरू झालं, असंच म्हणावे लागले.