शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

बाप-लेकांचा पक्षांतर फंडा; आतापर्यंत ३० नेत्यांची पक्षाशी फारकत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 10:26 IST

एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यांच्या मुलांचे पक्षांतर सुरू झालं, असंच म्हणावे लागले.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षातील नेते सैरभैर झाल्याचे चित्र होते. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता, भाजप सहज सत्ता मिळवणार, अस बहुतांशी नेत्यांनी गृहितच धरले आहे. त्यातच आपल्या वारसांना राजकारणात सक्रिय केलेल्या नेत्यांना अधिकच चिंता आहे. त्यामुळे पक्षांतर करून त्यांनाही सत्तेचा प्रत्यक्ष उपभोग घेता यावा ही या पक्षांतरामागील बाजू असण्याची शक्यता आहे.

एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ३० हून अधिक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनेक नेते विद्यमान आमदार होते. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघ राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्यामुळे तत्कालीन विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून ते विजयी झाले. त्यामुळे सहाजिकच सुजय विखे सत्ताधारी पक्षात खासदार म्हणून स्थिरावले. त्यांच्या पाठोपाठ वडील राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे आता दोन्ही बाप-लेक सत्ताधारीच झाले.

राष्ट्रवादीची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी देखील मुलाच्या इच्छेखातर भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे म्हटले. वैभव पिचड यांनी लोकसभेला राष्ट्रवादीला अकोले मतदार संघातून आघाडी मिळावून दिली. परंतु, ऐनवेळी त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. एकूणच वैभव पिचड यांनाही विरोधीपक्षाचा आमदार म्हणून राहण्याची इच्छा नाही, हे स्पष्टच आहे.

पिचड यांच्या पाठोपाठ विदर्भातील राष्ट्रवादीचे एकमेव नेते आणि आमदार मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. खुद्द इंद्रनील यांनीच आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले. पुसद येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर इंद्रनील शिवसेनेत जाणार असल्याचे मनोहर नाईक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचवेळी ययाती आणि इंद्रनील या दोन्ही मुलांना सांभाळून घेण्याचे आवाहन मनोहर नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले. मोहिते पाटील कुटुंबियांचे देखील असंच झाले. आधी रणजितसिंह मोहित पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला माढा मतदार संघातून जोरदार धक्का दिला. तर मुंबईतील नाईक कुटुंबीय देखील त्यांच मार्गाने निघाले आहे.

एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यांच्या मुलांचे पक्षांतर सुरू झालं, असंच म्हणावे लागले.